शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

"राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस छोडो कार्यक्रम सुरूय त्याची चिंता करायला हवी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 14:49 IST

BJP Radhakrishna Vikhe Patil Slams Congress Rahul Gandhi : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका केली आहे. 

जळगाव - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सुरू झाली आहे. सुमारे 3,500 किमी लांबीची ही भारत-जोडो यात्रा 12 राज्यांमधून जाणार आहे. सत्तेचा सर्वोच्च शिखर अनुभवलेल्या काँग्रेसची आज दयनीय अवस्था झाली आहे, देशभरात पक्ष अंतर्गत आणि बाह्य संघर्षाचा सामना करत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना (Congress Rahul Gandhi) या यात्रेतून मोठ्या आशा आहेत. याच दरम्यान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (BJP Radhakrishna Vikhe Patil) यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका केली आहे. 

राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेची उडवली खिल्ली आहे. "राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्याऐवजी काँग्रेस छोडो जो कार्यक्रम सुरू आहे, त्याची चिंता करायला हवी" असं म्हटलं आगे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज जनावरांवरील लम्पी स्किन आजाराच्या पाहणीसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. तसेच माझे कुटुंब, तुमची जबाबदारी, सत्ता गेल्याचं वैफल्य असं म्हणत विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला आहे. 

"सत्ता गेल्याचं वैफल्य काही लोकांना आलंय"

"सत्ता गेल्याचं वैफल्य काही लोकांना आलंय, त्यामुळे ते वैफल्यातून राज्य सरकारवर टीका करत आहेत, त्यांच्याकडे आपण फार लक्ष द्यायची गरज नाही. प्रत्येक विरोधकाच्या टीकेला उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही. राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करत आहे, चांगले निर्णय घेत आहे. सरकार म्हणून आम्ही जनतेची जबाबदारी घेतली, मागच्या सरकारसारखं आम्ही माझे कुटुंब तुमची जबाबदारी यासारखं वागणार नाही" असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. 

"भारत जोडो यात्रा म्हणजे गांधी घराण्याची कुटुंब वाचवण्याची मोहीम"

"भारत जोडो यात्रा" या मोहिमेवर भाजपाने हल्लाबोल केला आहे. भारत जोडो यात्रा म्हणजे गांधी घराण्याची कुटुंब वाचवण्याची मोहीम आहे अशा शब्दांत बोचरी टीका केली. तसेच पक्षावर गांधी कुटुंबाचे नियंत्रण ठेवण्यासाठी आणि राहुल गांधी यांना नेता म्हणून स्थापित करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे असं टीकास्त्रही सोडलं आहे. भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

"सध्या काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला सोडून जात असताना राहुल गांधी स्वत: पक्षाचे एकीकरण करू शकले नाहीत आणि ते आता भारत जोडो मोहीम चालवत आहे. ही एक कुटुंब वाचवण्याची मोहीम आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जात असताना कुटुंबाचा आणि पक्षाचा राजकीय विस्तार कमी होत चालला आहे. हे देशाला एकत्र आणण्यासाठी नाही तर राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाचा प्रमुख नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे" असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी