शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

जळगावात श्रीराम मंदिर संस्थानच्या वहनोत्सवात भारूडांनी रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 12:48 IST

वावडद्यातील ओम साई भजनी मंडळाचा पुढाकार

ठळक मुद्देविविध सादरीकरण विशेष वेशभुषा

जळगाव : रथोत्सव हा लोकोत्सव व्हावा असेच पूर्वीपासून प्रयत्न आहेत. उत्सवादरम्यान सादर होणारी भारूडे ही लोककला खास आकर्षणाचे केंद्र बनत असून वावडदा येथील साई भजनी मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा देत भक्तगणांकडून दाद मिळवत आहेत.श्रीराम मंदिर संस्थान हे जळगाव नगरीचे ग्रामदैवत असून मंदिराला लाभलेला धार्मिक व सांस्कृतिक वारसा हा अतिप्राचीन आहे. रथोत्सवाचे वेध लागले की त्या दरम्यान राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणाºयांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. श्रीराम मंदिरात तर पहाटे चार वाजेपासून दिवस सुरू होतो. सकाळची काकड आरती परिसरातील अन्य भक्तगणांना जाग आणते. मंदिरातील घंटेचा निनाद हा दूरवर ऐकू येतो. भक्तगणांकडून म्हटली जाणारी भजनेही उत्तमच. दुपारी महिला मंडळाकडूनही भजने सादर होतात. तुळशीची आरतीही महिला वर्ग मोठ्या उत्साहाने करतात. त्यानंतर सुरू होती ती सायंकाळची धावपळ. सायंकाळी निघणारे वहन म्हणजे उत्साहाला पारावार रहात नाही.बालगोपाल, अबालवृद्ध, महिलांचीही यावेळी धडपड असते. आपापल्या परीने हातभार लावण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचीच प्रचिती येते. याच दरम्यान भारूडे सादर करणाºया मंडळाचीही लगबग सुरू असल्याचे दिसून येते. वावडदा येथील ओम साई भजनी मंडळाचा या उत्सवातील सहभाग गेल्या अनेक वर्षापासूनचा. सायंकाळी वहनोत्सव सुरू झाला की जणू मंडळाच्या कलावंतांमध्ये देव संचारतो. वहनाबरोबर जात असताना अभंग, गवळण, भारूड सादर करताना ही मंडळी तल्लीन होऊन जातात.असे असते सादरीकरणसंबळ, मृदुंग, नाल, टाळ आणि पेटी असे या मंडळींचे वाद्य. संबळचा ताल घुमू लागला की पावले गतीन उचलली जातात. तीच प्रचिती येथे येते. सुरूवात होते ती अभंगाने. त्यानंतर गवळण होऊन भारूड सुरू होते. वाद्यांचा गजर अन् टाळ्यांचा गजर करत ही मंडळी नाचत असते. लोककलेचे हे सादरीकरण मोठी दाद मिळविणारे ठरत आहे.विशेष वेशभुषाडोक्यावर टोपी, अंगात पांडरे शुभ्र कपडे, गळ्यात लाल मफलर, कपाळी बुक्का..असा साधा पेहराव हे कलावंत करतात. सायंकाळी सात वाजता वहनाबरोबर कामाला सुरूवात होते ती रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असते. मध्यरात्री तीन वाजता ही मंडळी आपल्या घरी परतते. मात्र रथोत्सवाच्या उत्साहामुळे थकवा असा कधी जाणवत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.गमती जमतीसादरीकरणा दरम्यान केल्या जाणाºया गमती जमती उपस्थितांना खिळवून ठेवते व तेवढेच हसवतेही. त्यामुळे भारूड ते अभंग व गवळण असे सादर करताना उपस्थित अगदी खिळून असतात. उपस्थितांना तेथून उठून जाण्याची इच्छाही होत नाही. सादरीकरणादरम्यान कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची खबरदारी बाळगत असताना रथोत्सव हा एक लोकात्सव आहे त्याची परंपरा व शिस्त पाळण्याचाही मंडळी प्रयत्न करत असते.जनजागृतीचे माध्यमभारूड सादर करणारी ही मंडळी धार्मिकतेचा जागर करत असताना जनजागृती करण्याचाही प्रयत्न करत असते. त्यासाठीचे सादरीकरणही वेळोवेळी दाद मिळविणारे ठरत असल्याच्या भावना कलावंतांनी व्यक्त करत समाधान व्यक्त केले.यांचा असतो सहभागवाल्मीक गोपाळ, भास्कर गोपाळ, छगन गोपाळ, दीपक गोपाळ, विशाल गोपाळ, जगदीश गोपाळ, संदीप गोपाळ, कृष्णा गोपाळ, शुभम् राजपूत, भाऊसाहेब पाटील, सूजर गोपाळ, सुरेश गोपाळ, मुकेश ठाकरे हे उत्कृष्ठ सादरीकरण करतात. दिलीप सोनवणे, जितेंद्र वाळके, केशव बारी, गोकूळ साळुंखे हे पालखीधारी म्हणून तर जगन्नाथ दामू हे चोपदार म्हणून जबाबदारी संभाळतात.

टॅग्स :Indian Traditionsभारतीय परंपराJalgaonजळगाव