शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार... चुकीचे काम कराल तर होणार फोन टॅप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 10:06 IST

देशविघातक कार्य, दहशतवादी कारवाया, देशाची सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी व एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी आदी कारणांसाठी फोन टॅप केले जातात. याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी फोन टॅप करू नयेत, असे आदेशच गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी दिले आहेत.

- सुनील पाटील

जळगाव : चुकीचे काम करणार्यांचे फोन टॅप होण्याची शक्यता अधीक असते. मात्र राजकीय हेतूसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे व शिवसेना खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. खडसे यांचा ६७ वेळा तर राऊत यांचा ६० वेळा फोन टॅप झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. फोन टॅपिंग म्हणजे नेमके काय?, ते केव्हा आणि कसे केले जाते, त्याला कोणाची परवानगी लागते याविषयी ‘लोकमत’चा हा स्पेशल रिपोर्ट वाचकांसाठी देत आहोत.

देशविघातक कार्य, दहशतवादी कारवाया, देशाची सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी व एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी आदी कारणांसाठी फोन टॅप केले जातात. याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी फोन टॅप करू नयेत, असे आदेशच गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी दिले आहेत. जिल्हा पातळीवर फोन टॅप करायचा असेल तर त्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडून हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे जातो, तेथून तो राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तांकडे जातो, त्यानंतर गृह विभागाचे अपर मुख्य सचिव त्यास परवानगी देतात. त्याशिवाय मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र एटीएस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या तीन विभागांना फोन टॅप करण्याचे अधिकार आहेत. हे तिन्ही विभाग सलग सहा ते सात दिवस कुणाची रेकी करू शकतात. त्यापुढे त्यांनाही गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांचीच परवानगी घ्यावी लागते. गंभीर प्रकरणांशिवाय फोन टॅप करताच येत नाही.

या कायद्यान्वये करता येतो फोन टॅपदेशात कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप करायचा असेल तर भारतीय तार अधिनियम १९८५ कायद्यान्वये सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी, आंतरिक सुरक्षेसाठी, दहशतवादी कृतींना प्रतिबंध करण्यासाठी, संवेदनशील दखलपात्र गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी तसेच परदेशी मित्र राष्ट्रांचे हितसंबंध राखण्यासाठी अनुमती आहे.

कशामुळे चर्चेत आले प्रकरणरश्मी शुक्ला राज्य गुप्त वार्ता विभागात आयुक्त असताना राज्य गुप्त वार्ता विभागात (स्टेट इंटिलिजन्स डिपार्टमेंट-एसआयडी) आयुक्त असताना बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅप करून त्या फोनमधील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप आहे.

अशी आहे शिक्षेची तरतूदसुरक्षा यंत्रणा, सैन्यदल किंवा सरकारी आस्थापनांमध्ये हेरगिरी केल्यास आणि गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्यास १४ वर्षांची शिक्षा करण्याची तरतूद आहे. त्याशिवाय भारतीय तार अधिनियम कलम २६ अ नुसार इतर खटल्यांमध्ये ही शिक्षा तीन वर्षं कारावास व दंडाची तरतूद आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ...जिल्हा पातळीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत असलेल्या इंटरसेप्शन विभागातून हे कार्य करता येते, मात्र त्यासाठी तसे संवेदनशील प्रकरण असले पाहिजे. देशविरोधी कार्य, दहशतवाद किंवा अन्य गंभीर प्रकरण असेल तरच फोन टॅपिंग होते. त्यासाठी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते.- किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

विनापरवानगी फोन टॅपिंग केले तर भारतीय तार अधिनियम कलम २६ अ नुसार अशा व्यक्तीला तीन वर्षे कारावासाची शिक्षा आहे. त्यात दंडाचीही तरतूद आहे. सुरक्षा यंत्रणेत हेरगिरी तसेच गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्यास १४ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.- केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील

टॅग्स :Jalgaonजळगाव