शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

खबरदार... चुकीचे काम कराल तर होणार फोन टॅप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 10:06 IST

देशविघातक कार्य, दहशतवादी कारवाया, देशाची सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी व एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी आदी कारणांसाठी फोन टॅप केले जातात. याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी फोन टॅप करू नयेत, असे आदेशच गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी दिले आहेत.

- सुनील पाटील

जळगाव : चुकीचे काम करणार्यांचे फोन टॅप होण्याची शक्यता अधीक असते. मात्र राजकीय हेतूसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे व शिवसेना खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. खडसे यांचा ६७ वेळा तर राऊत यांचा ६० वेळा फोन टॅप झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. फोन टॅपिंग म्हणजे नेमके काय?, ते केव्हा आणि कसे केले जाते, त्याला कोणाची परवानगी लागते याविषयी ‘लोकमत’चा हा स्पेशल रिपोर्ट वाचकांसाठी देत आहोत.

देशविघातक कार्य, दहशतवादी कारवाया, देशाची सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी व एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी आदी कारणांसाठी फोन टॅप केले जातात. याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी फोन टॅप करू नयेत, असे आदेशच गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी दिले आहेत. जिल्हा पातळीवर फोन टॅप करायचा असेल तर त्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडून हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे जातो, तेथून तो राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तांकडे जातो, त्यानंतर गृह विभागाचे अपर मुख्य सचिव त्यास परवानगी देतात. त्याशिवाय मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र एटीएस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या तीन विभागांना फोन टॅप करण्याचे अधिकार आहेत. हे तिन्ही विभाग सलग सहा ते सात दिवस कुणाची रेकी करू शकतात. त्यापुढे त्यांनाही गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांचीच परवानगी घ्यावी लागते. गंभीर प्रकरणांशिवाय फोन टॅप करताच येत नाही.

या कायद्यान्वये करता येतो फोन टॅपदेशात कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप करायचा असेल तर भारतीय तार अधिनियम १९८५ कायद्यान्वये सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी, आंतरिक सुरक्षेसाठी, दहशतवादी कृतींना प्रतिबंध करण्यासाठी, संवेदनशील दखलपात्र गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी तसेच परदेशी मित्र राष्ट्रांचे हितसंबंध राखण्यासाठी अनुमती आहे.

कशामुळे चर्चेत आले प्रकरणरश्मी शुक्ला राज्य गुप्त वार्ता विभागात आयुक्त असताना राज्य गुप्त वार्ता विभागात (स्टेट इंटिलिजन्स डिपार्टमेंट-एसआयडी) आयुक्त असताना बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅप करून त्या फोनमधील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप आहे.

अशी आहे शिक्षेची तरतूदसुरक्षा यंत्रणा, सैन्यदल किंवा सरकारी आस्थापनांमध्ये हेरगिरी केल्यास आणि गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्यास १४ वर्षांची शिक्षा करण्याची तरतूद आहे. त्याशिवाय भारतीय तार अधिनियम कलम २६ अ नुसार इतर खटल्यांमध्ये ही शिक्षा तीन वर्षं कारावास व दंडाची तरतूद आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ...जिल्हा पातळीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत असलेल्या इंटरसेप्शन विभागातून हे कार्य करता येते, मात्र त्यासाठी तसे संवेदनशील प्रकरण असले पाहिजे. देशविरोधी कार्य, दहशतवाद किंवा अन्य गंभीर प्रकरण असेल तरच फोन टॅपिंग होते. त्यासाठी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते.- किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

विनापरवानगी फोन टॅपिंग केले तर भारतीय तार अधिनियम कलम २६ अ नुसार अशा व्यक्तीला तीन वर्षे कारावासाची शिक्षा आहे. त्यात दंडाचीही तरतूद आहे. सुरक्षा यंत्रणेत हेरगिरी तसेच गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्यास १४ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.- केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील

टॅग्स :Jalgaonजळगाव