शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बासमती तांदूळ पुन्हा मध्यमवर्गीयांच्या अवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 12:53 IST

कमी पावसामुळे उत्पादन घटून दर्जावरही परिणाम

ठळक मुद्देतीन वर्षानंतर तांदळाच्या भावात वाढतांदळाचा पेरा कमी

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - पावसाचे कमी प्रमाण व त्यातही मध्येच उघडीपमुळे तांदळाच्या उत्पादनात घट होऊन तीन वर्षानंतर तांदळाच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. बासमती तांदळाचे भाव १२०० ते १५०० तर इतर तांदळाचे भाव ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. यामुळे बासमती तांदूळ पुन्हा मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जात आहे.गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने त्याचा सर्वच पिकांवर परिणाम झाला. मात्र तांदळाला सलग १०० दिवस पाणी आवश्यक असते, अशात मध्येच पावसाने वारंवार उघडीप दिल्याने तांदळाच्या उत्पादनावर परिणाम झाला. या सोबतच दर्जावरही याचा परिणाम जाणवत आहे.एरव्ही साधारण डिसेंबर महिन्यापासून नवीन तांदळाची आवक सुरू होते. मात्र त्याची जास्त खरेदी उन्हाळ््यात धान्य खरेदी करीत असतानाच होते. यंदा एप्रिलपासून धान्य खरेदी वाढण्याचे चिन्हे असताना तांदळाचे भाव वाढले आहेत.तांदळाचा पेराही कमीकोणत्याही पिकाचे भाव कमी झाल्यास साधारण तीन वर्षानंतर ते पुन्हा वाढतात, असे निसर्गचक्रच आहे. गेल्या तीन वर्षांपासून तांदळाला भाव कमी मिळत असल्याने तांदूळ उत्पादकांनी यंदा तांदळाचा पेराही कमी केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यात पावसाचा परिणाम झाला.देशभरात सर्वत्र परिणामजळगावात विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, तूमसर या भागासह पंजाब, हरियाणा, छत्तीसगढ, कर्नाटक येथून तांदूळ येतो. यंदा या सर्व भागात पावसाचा परिणाम झाल्याने आवकही साधारण २० ते ३० टक्यांनी कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जळगावच्या बाजारपेठेत यामुळे बासमती तांदळाचे भाव १२०० ते १५०० तर इतर तांदळाचे भाव ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. गेल्या वर्षी १०५ रुपये किलोवर असलेल्या बासमती तांदळाचे भाव यंदा १२० रुपयांवर पोहचले आहेत तर चिनोर व इतर तांदळाचे भाव ३० ते ३२ रुपयांवरून ३५ ते ३६ रुपयांवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे ६० रुपये असो की ७० रुपये प्रति किलो सर्वच तांदळाचेही भाव चार ते पाच रुपये प्रति किलोने वाढले आहेत.जागतिक पातळीवर दर्जा मागे पडलायंदा भारतात पावसामुळे दर्जावर परिणाम झाल्याने ब्रह्मदेश, पाकिस्तान, थायलंड या तांदूळ उत्पादक देशांच्या तांदळाच्या दर्जाच्या तुलनेत भारताचा तांदूळ यंदा मागे पडत असल्याचेही व्यापाºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी