शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

बासमती तांदूळ पुन्हा मध्यमवर्गीयांच्या अवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 12:53 IST

कमी पावसामुळे उत्पादन घटून दर्जावरही परिणाम

ठळक मुद्देतीन वर्षानंतर तांदळाच्या भावात वाढतांदळाचा पेरा कमी

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - पावसाचे कमी प्रमाण व त्यातही मध्येच उघडीपमुळे तांदळाच्या उत्पादनात घट होऊन तीन वर्षानंतर तांदळाच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. बासमती तांदळाचे भाव १२०० ते १५०० तर इतर तांदळाचे भाव ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. यामुळे बासमती तांदूळ पुन्हा मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जात आहे.गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने त्याचा सर्वच पिकांवर परिणाम झाला. मात्र तांदळाला सलग १०० दिवस पाणी आवश्यक असते, अशात मध्येच पावसाने वारंवार उघडीप दिल्याने तांदळाच्या उत्पादनावर परिणाम झाला. या सोबतच दर्जावरही याचा परिणाम जाणवत आहे.एरव्ही साधारण डिसेंबर महिन्यापासून नवीन तांदळाची आवक सुरू होते. मात्र त्याची जास्त खरेदी उन्हाळ््यात धान्य खरेदी करीत असतानाच होते. यंदा एप्रिलपासून धान्य खरेदी वाढण्याचे चिन्हे असताना तांदळाचे भाव वाढले आहेत.तांदळाचा पेराही कमीकोणत्याही पिकाचे भाव कमी झाल्यास साधारण तीन वर्षानंतर ते पुन्हा वाढतात, असे निसर्गचक्रच आहे. गेल्या तीन वर्षांपासून तांदळाला भाव कमी मिळत असल्याने तांदूळ उत्पादकांनी यंदा तांदळाचा पेराही कमी केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यात पावसाचा परिणाम झाला.देशभरात सर्वत्र परिणामजळगावात विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, तूमसर या भागासह पंजाब, हरियाणा, छत्तीसगढ, कर्नाटक येथून तांदूळ येतो. यंदा या सर्व भागात पावसाचा परिणाम झाल्याने आवकही साधारण २० ते ३० टक्यांनी कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जळगावच्या बाजारपेठेत यामुळे बासमती तांदळाचे भाव १२०० ते १५०० तर इतर तांदळाचे भाव ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत. गेल्या वर्षी १०५ रुपये किलोवर असलेल्या बासमती तांदळाचे भाव यंदा १२० रुपयांवर पोहचले आहेत तर चिनोर व इतर तांदळाचे भाव ३० ते ३२ रुपयांवरून ३५ ते ३६ रुपयांवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे ६० रुपये असो की ७० रुपये प्रति किलो सर्वच तांदळाचेही भाव चार ते पाच रुपये प्रति किलोने वाढले आहेत.जागतिक पातळीवर दर्जा मागे पडलायंदा भारतात पावसामुळे दर्जावर परिणाम झाल्याने ब्रह्मदेश, पाकिस्तान, थायलंड या तांदूळ उत्पादक देशांच्या तांदळाच्या दर्जाच्या तुलनेत भारताचा तांदूळ यंदा मागे पडत असल्याचेही व्यापाºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी