शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

पोलिसांवरील हल्ला, आरोपांच्या घटनांनी खाकी डागाळली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:27 IST

खरच पोलीस चुकतायं का?, आत्मपरीक्षण करण्याची गरज

सुनील पाटील जळगाव : गेल्या महिनाभरात पोलिसांवर आरोप असो कि थेट हल्ला यामुळे खाकी नक्कीच डागाळली गेली. प्रत्येक घटनांचा बारकाईने अभ्यास केला तर कुठे ना कुठे पाणी मुरतय..काही घटना पाहता खरच पोलीस चुकताय का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. परिस्थितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांंची बदलणारी भूमिका देखील घातक ठरत आहे.गेल्या महिन्यात पोलिसांना आव्हान देणारी घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली. सर्वत्र वाळू बंदी असतानाही शहरातून बिनधास्तपणे वाळूची डंपर व ट्रॅक्टर वापरत आहेत.पोलीस, आरटीओ व महसूल या तिनही यंत्रणांची जबाबदारी असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. आकाशवाणी चौकात वाळू वाहतूक करणारे डंपर अडविले म्हणून वाळूमाफियांनी थेट महामार्गावरच ठिय्या मांडला, त्याही पुढे जावून वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनाच मुख्यालयात जमा करण्याची धमकी देण्यात आली. आधीच चुकीचे काम, त्यावर कारवाई करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच दम भरला जातो. याठिकाणी नेमके कोणाचे चुकले, कारवाई करणे वाळूमाफियांना का झोंबले. पोलिसांशी हुज्जत घालण्याची हिंमत का आली?, एक दिवस उशिराने का गुन्हा दाखल झाला? या प्रश्नांची उत्तरे वाळूमाफिया व पोलीस हेच देऊ शकतील.या घटना पाहता नागरिकांचा पोलिसांवर रोष आहे की? पोलिसांकडून काही चुका होत आहेत.पोलिसाची कॉलर पकडलीदुचाकीवरुन तीन सीट जाणाºया तरुणांना हटकले असता त्यातील एकाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून थेट कॉलर पकडली. येथेही कारवाई करण्याच्या कारणावरुनच वादाची ठिणगी पडली. या प्रकरणातही गुन्हा दाखल झाला, मात्र सामान्य व्यक्तीची पोलिसाची कॉलर पकडण्यापर्यंत मजल गेलीच कशी? त्यामागे नेमके काय कारण आहे?, हा प्रकार ताजा असतानाच पोलीस अधीक्षकांनी महामार्गावर ट्रक अडविणाºया पोलिसाला मुख्यालयात जमा केले.वाहतूक पोलीसच सर्वाधिक टार्गेट झाल्याचे प्रकरणे घडली आहेत.कैदी बंदोबस्त नोकरी जिकरीचीकैदी बंदोबस्त ड्युटी करणे जिकरीची व तारेवरची कसरत झालेली आहे. गेल्या आठवड्यात २३ फेब्रुवारी रोजी खुनातील गुन्ह्यातील आरोपीने दोन पोलिसांना चावा घेतला. या आरोपीने अक्षरश: रुग्णालय डोक्यावर घेतले. काही दोष नसलेल्या पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागला.गुन्हेगार पोलिसांवरच वरचढ कसे ठरतात हे त्याचे उदाहरण आहे. ठाणे जिल्ह्यातील दिंडोशी मार्गावरही पोलीस व्हॅनमध्ये आरोपीने पोलिसांना अक्षरश: खालच्या पातळीवर जावून शिवीगाळ केली व अंगावर थुंकला. हा व्हीडीओ राज्यभर व्हायरल झाला.अधिकाºयांची सोयीनुसार बदलते भूमिकापोलिसांवर हल्ला असो की आरोप, अशा प्रकरणांमध्ये अधिकाºयांची सोयीनुसार भूमिका बदललेली पोलिसांनी पाहिली आहे. आपल्या अंगावर शेकायला लागले की कर्मचाºयांवर ढकलून मोकळे व्हायचे. मलई सर्वांनीच खायची तर मग शिक्षा एकालाच का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पालकाला सर्व पाल्य एकसारखेच असतात, त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी पालक या नात्यानेच आपली भूमिका निभावणे गरजेचे आहे?, अन्यथा पालकावरचाच विश्वास उडाल्यासारखे होईल.अनेक कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात, त्यांना कामाच्या ठिकाणी त्रास होतो, मात्र अशा वेळी अधिकारी बाजू घेत नाही, मोजक्याच कर्मचाºयांची बाजु घेतली जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांना आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.पोलिसांवरील हल्ला व आरोपांच्या काही लक्षवेधी घटना२ फेबु्वारी : कंजरवाड्यात पोलिसांच्या बैठकीत तरुणाने गोंधळ घातला.९ फेब्रुवारी : वाळूमाफियांनी वाहतूक पोलिसांच्याविरोधात महामार्ग रोखला२३ फेब्रुवारी : खुनातील आरोपीने घेतला पोलिसांना चावा२५ फेब्रुवारी : जिल्हा रुग्णालयात पोलिसाच्या कानशिलात लगावली२५ फेब्रुवारी : आकाशवाणी चौकात वाहतूक पोलिसाची कॉलर पकडली२९ फेब्रवारी : शनी पेठ पोलीस ठाण्यातच गोंधळ आणि पोलिसांवर आरोप

टॅग्स :Jalgaonजळगाव