शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 2:25 PM

सुविधांची बोंबाबोंब : वर्षभरात शहराचा चेहराही तोच, समस्याही तीच, विकासाच्या स्वप्नांची राखरांगोळी ‘याची देही’ पाहण्याचे दुर्भाग्य

जळगाव : विकासाच्या नावावर मते मागत वर्षभरात जळगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलवण्याची भाषा करणाऱ्यांनीही जळगावकरांची निराशा केली आहे. विकास तर दूरच आहे, परंतु पार शहराची दूरवस्था करुन टाकली आहे. रस्त्यांवर तयार झालेल्या खड्डयांमध्ये सर्वसामान्य निष्पाप जळगावकरांचा बळी जात असून देखील निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधींकडून केवळ खोट्या आश्वासनांची खैरात केली जात आहे. विकासाच्या स्वप्नांची अक्षरश: राखरांगोळी नागरिक ‘याची देही याची डोळा’ पाहू लागले आहेत.वर्षभरापूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत शिवसेना व भाजपाच्या नेत्यांकडून केवळ विकासाच्या नावावर मते मागण्यात आली. जळगावकरांनीही विकासाच्या नावावर भाजपाला पहिल्यांदाच मनपाचे दार उघडून देत सत्तेच्या चाब्या दिल्या. आतापर्यंतच्या १० महिन्याचा काळात एकही ठोस काम सत्ताधाऱ्यांना करता आलेले नाही. रस्त्यांचा दुरावस्थेमुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीतच घेवून वाहने चालवावी लागत आहेत. आता केवळ महामार्गच नाही तर शहरातील एखादा चौक किंवा उपनगरातील रस्ताही वाहनधारकांच्या जीवावर उठलेला दिसून येत आहे.राखून ठेवला १०० कोटींचा निधी ?शहराच्या विकासासाठी १६ आॅगस्ट २०१८ रोजी शासनाने नगरोथ्थान अंतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. निधी जाहीर होवून आता ११ महिन्यांचा काळ लोटला. पण हा निधी अजून प्रशासकीय प्रक्रियेतच अडकला आहे.अनिल बोरोले यांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदार व अधिका-यांवर गुन्हे दाखल कराउद्योजक अनिल बोरोले यांचा शुक्रवारी सायंकाळी शहरातील खड्डयामुळे अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अपघातास रस्ता तयार करणारे ठेकेदार व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी पोलीस अधीक्षकांकडे एका पत्राद्वारे केली आहे. गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबई पोलीस अधिनियमातील फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४९, १५० व १५१ नुसार पोलिसांनीच स्वत:हून अशा घटनांमध्ये पुढाकार घेऊन फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करण्याचा नियम आहे. चित्रा चौकातील अपघात प्रकरणी अधिकारी व ठेकेदार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची विनंती गुप्ता यांनी केली आहे.विश्वासाला मिळाले धूळ, चिखल अन् खड्डयांची भेटजळगावकरांनी दाखवलेल्या प्रेमाचा ‘विश्वासघात ’लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. १० महिन्यात जळगावकरांच्या नशिबी धूळ, चिखल, कच-याचे ढीग अन् रस्त्यांमधील जीवघेणे खड्डे अशीच भेट या निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधींनी दिली आहे. अमृत योजना नागरिकांसाठी फायद्याची असली तरी मक्तेदाराचे दुर्लक्ष व प्रशासनाच्या बेफीकरीमुळे ती जळगावकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. निविदेत निश्चित केल्यानुसार मक्तेदारानी खड्डे खोदल्यानंतर ते खड्डे डांबरने दुरुस्त करणे गरजेचे होते. मात्र, तसे होताना दिसून येत नसून मक्तेदारावर सत्ताधारी किंवा प्रशासनाचेही कुठलेही लक्ष दिसून येत नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव