शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई : एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:16 PM

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची भीषण स्थिती आहे. तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी तीन महिन्यांचा कालावधी जिल्हा प्रशासनाकडून लावला जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा गावात पाण्याअभावी निम्मे गाव स्थलांतरीत झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देलाल गोटा गावातील नागरिकांचे पाण्याअभावी स्थलांतरनिमखेड गावातील टंचाई प्रस्तावावर तीन महिने कार्यवाही नाहीजळगाव जिल्ह्यातील विकासाचा वेग मंदावला

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२३ : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची भीषण स्थिती आहे. तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी तीन महिन्यांचा कालावधी जिल्हा प्रशासनाकडून लावला जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा गावात पाण्याअभावी निम्मे गाव स्थलांतरीत झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.सध्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. मात्र या प्रकरणी जिल्हा प्रशासन गंभीर नाही. मुक्ताईनगर तालुक्यातील लाल गोटा गावात पाण्याची कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने गावातील निम्मे कुटुंब स्थलांतरीत झाले आहे. निमखेड गावातील पाणी टंचाई संदर्भात १४ मार्च रोजी तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेसाठी ५ लाख २२ हजारांचा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र त्यामध्ये त्रुटी काढून हा प्रस्ताव परत पाठविण्यात आला. त्यानंतर जि.प.सीईओ यांनी आपल्याला पाच लाखांपर्यंतच्या मंजुरीचे अधिकार असल्याची त्रुटी काढली. त्यानंतर नव्याने तीन लाखांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यानंतर काल हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. एका प्रस्तावासाठी फाईल मंजुरीचा तीन महिन्यांचा प्रवास होत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाकडून पाणी टंचाईबाबत काय उपाययोजना करण्यात आली याबाबत आपण माहिती मागविली असून त्यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करणार आहोत. उन्हाळ्याची स्थिती असताना जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत किती आणि कोठे कामे सुरु आहे असा सवाल त्यांनी केला. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याअभावी जळगाव जिल्ह्यातील विकासात शिथीलता आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगाव