शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जळगावचा अर्चित पाटील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 19:59 IST

जळगाव  - येथील काशिनाथ पलोड विद्यालयाचा विद्यार्थी अर्चित राहुल पाटील यास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने आज व्हर्च्युअली कार्यक्रमात सन्मानित ...

जळगाव  - येथील काशिनाथ पलोड विद्यालयाचा विद्यार्थी अर्चित राहुल पाटील यास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने आज व्हर्च्युअली कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनीही अर्चित पाटील याचा शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व जळगाव जिल्ह्याचे कॉपीटेबल बुल देऊन सत्कार केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे वितरण दरवर्षी होते. यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे व्हर्च्युअली कार्यक्रमात पंतप्रधानाच्यावतीने जिल्हाधिकारी राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील एनआयसी कार्यालयात अर्चितला सन्मानित केले.विशेष शौर्य गाजविणाऱ्या 18 वर्षाखालील मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्याची नावे यापूर्वीच जाहीर करण्यात आली असून त्यात सर्वाधिक 5 पुरस्कार महाराष्ट्रातील मुलांना जाहीर झाले आहेत. त्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या अर्चित राहुल पाटील याची नवनिर्माण क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली आहे.पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी  25 जानेवारी दुपारी 12.00 व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे पुरस्कार प्राप्त बालकांना पुरस्कृत केले. यावेळी केंद्रीय महिला बाल कल्याण मंत्री श्रीमती स्मृती ईराणी उपस्थित होत्या. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अर्चित राहुल पाटील याचा सन्मान व अभिनंदन केले. याप्रसंगी अर्चित पाटील याचे आई-वडील, आजी यांचेसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी उपस्थित होते. देशातील एकूण 32 मुलांना शौर्य, समाज व क्रिडा, कला व सांस्कृतीक व नवनिर्माण या क्षेत्राकरीता हे पुरस्कार देण्यात आले. यात महाराष्ट्राच्या 5 मुलांचा समावेश असून जळगाव जिल्ह्याला या पुरस्काराचा सन्मान सलग दुसऱ्यांदा मिळाल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.अर्चित राहूल पाटील याचा परिचयअर्चित पाटील हा येथील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी असून इनोव्हेटिव्ह, लाइफ सेव्हिंग, अल्ट्रा लो कॉस्ट सिलिकॉन डिव्हाइस, पोस्टपार्टम हेमोररेज कप (पीपीएच कप) विकसित केले आहे. हे प्रसूतीनंतर रक्त कमी होणे अचूकपणे आणि रीअल-टाइममध्ये मोजण्यात मदत करते.प्रसूती, पॅरामेडिक्स आणि रूग्णांनी पीपीएच कपमध्ये सहज रुपांतर केले. प्रसुतिपूर्व रक्तस्राव (पीपीएच) च्या बाबतीत लवकर उपाययोजना करून अनेकांचे प्राण वाचू शकेल. ओव्हरेन्टुसिएस्टीक मोठ्या प्रमाणात रक्त संक्रमण आणि त्याच्याशी संबंधित दुष्परिणाम रोखले गेले. यामुळे बायोमेडिकल सॅनिटरी कचऱ्याची निर्मिती कमी केली गेली. या ५० ग्रॅम डिव्हाइसचा प्रभाव प्रचंड आणि प्रमाणीकृत आहे. याचा वापर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केला जात आहे. पीपीएचमुळे जागतिक पातळीवर माता मृत्युदर कमी होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी स्वच्छताविषयक कचऱ्यावरील डॉ. होमी भाभा बाल वैद्यनिक स्पर्धात २०१७-१८ मध्ये विज्ञान संशोधन प्रकल्प ह्लटर्न अवर रेड ग्रीनह्व अर्चितला सुवर्णपदक मिळाले होते.मी भारत सरकारच्या माता आणि बाल आरोग्य योजनांमध्ये या डिव्हाइसचा समावेश करण्याची प्रार्थना करतो. तळागाळातील स्तरावर पोहोचण्याद्वारे, जर मी एखाद्या आईचे जीवन वाचविण्यास योगदान देऊ शकलो तर ते माझे सर्वात मोठे यश असेल असे अर्चितने हा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हटले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव