शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

अक्षय तृयीया : कृषी संस्कृतीचा चैतन्य सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:01 IST

अक्षय तृतीया म्हणजे कृषी संस्कृतीचा एकप्रकारे चैतन्य सोहळाच असतो, याविषयी लोकमतच्या मंथन पुरवणीत लिहिताहेत खेडगाव, ता.भडगाव येथील वार्ताहर संजय हिरे....

  शेतशिवारात वैशाख वणवा पेटलेला. रुक्ष वातावरणात शेती, शेतकरी व त्यावर आधारित कृषी व्यवस्थेला काहीसे चैतन्य घेऊन येणारा सण म्हणजे आखाजी अर्थात अक्षय तृतीया. वाडवडिलांनी, पूर्वजांनी जाणीवपूर्वक कृषी संस्कृतीचा हा चैतन्य सोहळा जपला आहे. याची सुरवात खरं तर चैत्र पौर्णिमेला होते.शेतकरी कन्या गौरी (गवराई)ची स्थापनाकाळा वावरमा झोपाया आंबा, थटे उतरनी गौराई रंभाअशी कृषी संस्कृतीची श्रीमंती व श्रध्दा, भक्ती याची सांगड घालत करते. अक्षरशः पार्वती मातेला आपल्या पित्याच्या शेतात उतरवत चैतन्याचा मळा फुलवते. हा उत्सव थेट अक्षय तृतीयेपर्यंत सुरू असतो. यात शेतीवर आधारित सुतार, कुंभार आदी बारा बलुतेदार, गाव कारु-नारु, शेतकरी बाप व त्याचे वैभव, सालदार-शेतगडी या घटकांना गुंफत झोपाळ्यावर बसून उंचच-उंच झोका घेत गोडवे गायले जातात.कृषी संस्कृतीत श्रमाला, कष्टणा-या हाताला पूज्य मानले जाते. म्हणूनच वाडवडिलांचे स्मरण पित्तरांच्या रुपात केले जाते. शेती, काळ्या आईच्या रुपात हा अमृत 'कुंभ, भावी पिढीच्या हाती सोपवत एकूणच कृषी वैभवाचे जतन केले जाते. म्हणूनच या दिवशी डेरगं म्हणजे घागरी भरीत पूजन केले जाते.खरिपाचा धांडोळाअक्षय तृतीया म्हणजे खरिप हंगामाचा पाठविलेला धांडोळाच होय. खरिप हंगामाला वर्षाचे सोन्याचे चाच म्हणूनच महत्व आहे. या दिवसात शेतीमशागतीला जोर आलेला असतो. शेतीअवजारांच्या निर्मितीतून सुतार, लोहार, कुंभार यांच्या हाताला काम मिळत असते. पूर्वी रब्बीत निघणाऱ्या शेतमालाचे खळे या दिवसात लावले जाई. मोबदल्याच्या रुपात धान्य खळे मागणा-या बारा-बलुतेदारांना मिळत असे. त्यांच्या पोटा-पाण्याची व्यवस्था होई. त्यांना पुरणपोळी, आमरस असे गोडधोड जेवण मिळत, श्रमसंस्कृतीला तृप्त केले जाई. यातून चैतन्य, उर्जा मिळत नव्या दमाने काळ्या आईची सेवा घडे.शेतकरी-सालदारांचे 'मार्च एण्ड'पूर्वीपासून खानदेशात अक्षय तृतीयेला शेतीकामासाठी वर्षभर सालदार म्हणून गडी ठरवण्याची पध्दत आहे. भलेही आर्थिक वर्षे म्हणून 'मार्च एण्ड:ला महत्व असले तरी शेतकरी-सालदारांचे अक्षय तृतीयेला साल, वर्ष संपते. खरिप हंगामाच्या दृष्टीने घातलेली ही सांगड होय. धान्य, कपडेलत्ते, गोडधोड जेवण व वर्षाचा मोबदला असे साल ठरवले जाते. भलेही आज सालदार नावालाच उरलेत तरीदेखील ही पध्दत अक्षय तृतीयेला सुरुच आहे.आखाजीसारखा सण..कृषी संस्कृतीत शेतकरी कन्येला केंद्रस्थानी ठेवत अक्षय तृतीयेला महत्व दिले जाते. म्हणूनच शेतकरी बापाच्या वावरातील आम्रवृक्षाखाली  दर आखाजीला गौरचे पाणी खेळणारी लेक मोठी होत सासरी जाते तेव्हा तिचे डोळे येणा-या अक्षय तृतीयेला माहेरच्या वाटेकडे लागलेले असतात. निम वृक्षाला बांधलेला उंचच झोका, गावरान आम्रवृक्ष हे तिला खुणावत असतात अन् मग नकळत तिच्या ओठावर खानदेशी गाण्याचे कडवे येतात.उना आखाजीना सण, भाऊ ऊना मुरायी लेवाले..!किंवाआखाजीसारखा सण.., सण बाई टिपरना खेवाले...!एकूणच अक्षय तृतीया हा सण  कुणासाठी विरगुंळा, कुणासाठी धांडोळा, कुणासाठी कळवळा असा कृषी संस्कृतीचा कुंभमेळा ठरावा.लेखन--संजय हिरे, खेडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव