शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

अक्षय तृयीया : कृषी संस्कृतीचा चैतन्य सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:01 IST

अक्षय तृतीया म्हणजे कृषी संस्कृतीचा एकप्रकारे चैतन्य सोहळाच असतो, याविषयी लोकमतच्या मंथन पुरवणीत लिहिताहेत खेडगाव, ता.भडगाव येथील वार्ताहर संजय हिरे....

  शेतशिवारात वैशाख वणवा पेटलेला. रुक्ष वातावरणात शेती, शेतकरी व त्यावर आधारित कृषी व्यवस्थेला काहीसे चैतन्य घेऊन येणारा सण म्हणजे आखाजी अर्थात अक्षय तृतीया. वाडवडिलांनी, पूर्वजांनी जाणीवपूर्वक कृषी संस्कृतीचा हा चैतन्य सोहळा जपला आहे. याची सुरवात खरं तर चैत्र पौर्णिमेला होते.शेतकरी कन्या गौरी (गवराई)ची स्थापनाकाळा वावरमा झोपाया आंबा, थटे उतरनी गौराई रंभाअशी कृषी संस्कृतीची श्रीमंती व श्रध्दा, भक्ती याची सांगड घालत करते. अक्षरशः पार्वती मातेला आपल्या पित्याच्या शेतात उतरवत चैतन्याचा मळा फुलवते. हा उत्सव थेट अक्षय तृतीयेपर्यंत सुरू असतो. यात शेतीवर आधारित सुतार, कुंभार आदी बारा बलुतेदार, गाव कारु-नारु, शेतकरी बाप व त्याचे वैभव, सालदार-शेतगडी या घटकांना गुंफत झोपाळ्यावर बसून उंचच-उंच झोका घेत गोडवे गायले जातात.कृषी संस्कृतीत श्रमाला, कष्टणा-या हाताला पूज्य मानले जाते. म्हणूनच वाडवडिलांचे स्मरण पित्तरांच्या रुपात केले जाते. शेती, काळ्या आईच्या रुपात हा अमृत 'कुंभ, भावी पिढीच्या हाती सोपवत एकूणच कृषी वैभवाचे जतन केले जाते. म्हणूनच या दिवशी डेरगं म्हणजे घागरी भरीत पूजन केले जाते.खरिपाचा धांडोळाअक्षय तृतीया म्हणजे खरिप हंगामाचा पाठविलेला धांडोळाच होय. खरिप हंगामाला वर्षाचे सोन्याचे चाच म्हणूनच महत्व आहे. या दिवसात शेतीमशागतीला जोर आलेला असतो. शेतीअवजारांच्या निर्मितीतून सुतार, लोहार, कुंभार यांच्या हाताला काम मिळत असते. पूर्वी रब्बीत निघणाऱ्या शेतमालाचे खळे या दिवसात लावले जाई. मोबदल्याच्या रुपात धान्य खळे मागणा-या बारा-बलुतेदारांना मिळत असे. त्यांच्या पोटा-पाण्याची व्यवस्था होई. त्यांना पुरणपोळी, आमरस असे गोडधोड जेवण मिळत, श्रमसंस्कृतीला तृप्त केले जाई. यातून चैतन्य, उर्जा मिळत नव्या दमाने काळ्या आईची सेवा घडे.शेतकरी-सालदारांचे 'मार्च एण्ड'पूर्वीपासून खानदेशात अक्षय तृतीयेला शेतीकामासाठी वर्षभर सालदार म्हणून गडी ठरवण्याची पध्दत आहे. भलेही आर्थिक वर्षे म्हणून 'मार्च एण्ड:ला महत्व असले तरी शेतकरी-सालदारांचे अक्षय तृतीयेला साल, वर्ष संपते. खरिप हंगामाच्या दृष्टीने घातलेली ही सांगड होय. धान्य, कपडेलत्ते, गोडधोड जेवण व वर्षाचा मोबदला असे साल ठरवले जाते. भलेही आज सालदार नावालाच उरलेत तरीदेखील ही पध्दत अक्षय तृतीयेला सुरुच आहे.आखाजीसारखा सण..कृषी संस्कृतीत शेतकरी कन्येला केंद्रस्थानी ठेवत अक्षय तृतीयेला महत्व दिले जाते. म्हणूनच शेतकरी बापाच्या वावरातील आम्रवृक्षाखाली  दर आखाजीला गौरचे पाणी खेळणारी लेक मोठी होत सासरी जाते तेव्हा तिचे डोळे येणा-या अक्षय तृतीयेला माहेरच्या वाटेकडे लागलेले असतात. निम वृक्षाला बांधलेला उंचच झोका, गावरान आम्रवृक्ष हे तिला खुणावत असतात अन् मग नकळत तिच्या ओठावर खानदेशी गाण्याचे कडवे येतात.उना आखाजीना सण, भाऊ ऊना मुरायी लेवाले..!किंवाआखाजीसारखा सण.., सण बाई टिपरना खेवाले...!एकूणच अक्षय तृतीया हा सण  कुणासाठी विरगुंळा, कुणासाठी धांडोळा, कुणासाठी कळवळा असा कृषी संस्कृतीचा कुंभमेळा ठरावा.लेखन--संजय हिरे, खेडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव