शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

केमिकल्स कंपनीत अग्नितांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 11:40 AM

शेजारील दोन कंपन्याही जळून खाक: बालंबाल बचावले कामगार

जळगाव : रिअ‍ॅक्टरमध्ये दाब निर्माण झाल्याने केमिकल्स निर्मिती करणाऱ्या एमआयडीसीतील रवी इंडस्ट्रीज कंपनीत स्फोट होऊन अचानक आग लागली. यात सुदैवाने काम करणारे कामगार बालंबाल बचावले असून या स्फोटामुळे दोन कंपन्या आगीत खाक झाल्या आहेत. या घटनेत जीवत हानी झालेली नसली तरी कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील जी सेक्टर ४५ मध्ये रवींद्र पाटील यांच्या मालकीची रवी इंडस्ट्रीज ही केमिकल्स निर्मिती करणारी कंपनी आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता कंपनीत रिअ‍ॅक्टरमध्ये दाब निर्माण झाल्याने अचानक स्फोट झाला. त्यामुळे कंपनीतील केमिकल्स निर्मितीच्या एका पाठोपाठ सहा स्फोट झाले. त्यात तीन टाक्या फुटून आगीच काही मिनिटात भीषण आगीत रुपांतर झाले. काही वेळातच रवी इंडस्ट्रीज या कंपनीसह तिच्या बाजूची अविजिता इंटरप्रायझेस ही प्लास्टिकचे पीव्हीसी पाईप बनविणारी कंपनीच्या आगीत सापडली.आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्नजैन कंपनी, महापालिका तसेच मेरीको या कंपनीतील अग्निशमन बंब तसेच १५० फोमच्या कॅन मागविण्यात आल्या होत्या. सर्व जवानांनी जीव धोक्यात घालून आग नियंत्रणात आणली. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संभाव्य धोका लक्षात घेता कंपनीच्याजवळपास कोणालाही जावू दिले जात नव्हते. दरम्यान, या घटनेत नेमके किती नुकसान झाले, कोणाला इजा झाली का? याबाबत अधिकृत बोलायला कोणीही तयार नव्हते.गीतांजली कंपनीच्या आठवणी ताज्यागेल्या वर्षी एमआयडीसीत गितांजली केमिकल्स या कंपनीतही रिअ‍ॅक्टरमध्ये दाब निर्माण झाल्याने स्फोट होऊन सहा ते सात कामगार भाजून मृत्यूमुखी पडले होते. या कंपनीत अगदी तसाच स्फोट झाला. कामगार किती होते व कोण होते याबाबत माहिती दिली जात नव्हती. या घटनेच्या निमित्ताने गितांजली केमिकल्स कंपनीच्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.विना परवानगी कंपनी सुरु असल्याचा आरोपजी सेक्टर ४५ मध्ये असलेल्या रवी इंडस्ट्रीज या कंपनीला परवानगी नाही. तरीही या कंपनीत केमिकलचे रिफायनरींग केले जात असल्याचा आरोप शेजारील कंपनी मालकांनी केला. त्यांनी कामगारांना सोबत घेऊन रात्री साडे नऊ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून विना परवानगी कंपनी सुरु असल्याची माहिती दिली. या कंपनीतील तीन हजार लिटरची टाकी फुटली तर संपूर्ण जी सेक्टर खाक होईल, अशी ही भिती येथील उपस्थित कामगारांकडून व्यक्त केली जात होती.तीनशे मीटरपर्यंत गटारीत आगया स्फोटामुळे रस्त्यावरील गटारीतून केमिकल्स वाहू लागल्याने त्यासोबतच आगही होती.तब्बल तीनशे मीटरपर्यंत नालीतून आग वाहत होती. या स्फोटामुळे परिसरातील कंपनीतील कामगार पळत सुटले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. शहर व परिसरातील कंपन्या व मनपाचे अग्निशमन बंब मागविण्यात आले होते. चार तासानंतर आग आटोक्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव