शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ‘अग्निहोत्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:27 IST

डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले : जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा, मन समृध्द करणारा हा तर महामार्ग

जळगाव : अग्निहोत्र हा मन समृद्ध करण्याचा महामार्ग आहे. तणावमुक्त व आरोग्य संपन्न समाज यातून घडत आहे, असे मत अक्कलकोट येथील विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवले यांनी व्यक्त केले.नुकत्याच आयोजित केलेल्या सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दिली. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला. ‘अग्निहोत्र’चे फायदे, तसेच प्रदूषण रोखण्यासाठी ‘अग्निहोत्र’चा कसा फायदा होतो, याबाबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्याशी झालेला हा संवाद.

प्रश्न : अग्निहोत्र म्हणजे काय? ते केव्हा करावे?उत्तर : सूर्र्यचक्रानुसार पृथ्वीचे परिचालन होते. सूर्य हा सृष्टीचा महत्वाचा घालक आहे. सूर्याच्या अस्तित्वाशिवाय सृष्टीची कल्पनादेखील आपण करू शकत नाही. म्हणून सूर्याच्या तालचक्रावर मन:शांतीसाठी सूर्योदय व सुर्यास्तावेळी कृतज्ञतापूर्वक आहुती देणे म्हणजे अग्निहोत्र होय. अग्निहोत्र हा दैनंदिन केला जाणारा एक यज्ञ आहे. सूर्योदय व सूर्यास्तावेळी घरामधील वातावरण पवित्र करण्यासाठी अग्निहोत्र यज्ञ केला जातो. आयुर्वेदानुसार अग्निहोत्रामुळे अनेक व्याधींवर मात करता येते आणि जीवन आरोग्यसंपन्न होते.

प्रश्न : अग्निहोत्र संकल्पना जगासमोर मांडण्याची सुरुवात आपण कशी केली?उत्तर : आज प्रत्येक मानव कोणत्या ना कोणत्या तणावाखाली जगत आहे. केवळ ताणतणाव वाहून नेण्यासाठीच आपले जीवन नाही तर मन व बुद्धी तणावरहित करून जीवनातील संकटांना मुक्तपणे सामोरे जाण्याचे सामर्थ्य निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी दत्त परंपरेने आम्हाला अग्निहोत्र दिले. याद्वारे मानव मानसिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यातून या कायार्ची सुरुवात केली.

प्रश्न : धावपळीच्या जीवनात तरुणांनी आपली कर्तव्ये व अध्यात्म यांची सांगड कशी घालावी?उत्तर : तारुण्यावस्था हा आयुष्याला कलाटणी देणारा काळ असतो. या अवस्थेत मन पुष्ट केल्यास उदंड सामर्थ्य मिळते. उज्वल भवितव्य घडविण्यासाठी तसेच जीवनात येणाऱ्या समस्यांचा लढा देण्यासाठी दररोज थोडा वेळ देऊन अग्निहोत्र करावे. यातून कौटुंबिक वातावरण पवित्र होते. तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे. आज कित्येक तरुण नैराश्यातून आत्महत्या करतात. ही बाब अत्यंत खेदजनक असून मिळालेल्या सुंदर जीवनातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला हवा.

प्रश्न : अग्निहोत्रातून पर्यावरण संतुलन कसे राखले जाते?उत्तर : ज्या ठिकाणी सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम होतात तिथे याबाबत संशोधनासाठी उपकरणे मुंबई येथील एका संस्थेने ठेवलेली असतात. यातून पर्यावरण शुद्धी कशी होते हे संशोधनाअंती जाहीर करणार आहे.अध्यात्म म्हणजे केवळ परंपरांचे अनुकरण नव्हे. प्रत्येक धार्मिक उत्सवातून जीवनात बदल घडावा, हा उद्देश आहे. जीवन हे केवळ कालचक्र नसून ते कर्म आणि परमार्थ यांची सांगड घालून प्रत्येक क्षण सत्कारणी लावण्यासाठी जगायला हवे. जीवनात मन:शांती व समाधान हवे.-डॉ. पुरुषोत्त राजीमवले

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव