शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल वर्षभरानंतर मनपाकडून दीड कोटीचा निधी महावितरणकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब स्थलांतरासाठी मनपाने अखेर महावितरणकडे दीड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब स्थलांतरासाठी मनपाने अखेर महावितरणकडे दीड कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. मंगळवारी मनपाच्या विद्युत विभागाने दीड कोटी रुपयांचा धनादेश महावितरणकडे वर्ग केला आहे. गेल्या वर्षभरापासून या निधीच्या प्रश्नावरून हे काम थांबले होते. एकीकडे मनपाने दीड कोटी रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केला असला तरी काम सुरू करण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षभरापासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम थांबले आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कामामुळेच तब्बल ५ लाख नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या प्रश्नाबाबत ‘लोकमत’ने सातत्याने प्रश्न मांडून मनपा, महावितरण प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ या निधीची राज्य शासन व विभागीय आयुक्तांकडून मंजुरी घेऊन, निधी वर्ग करण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. आता निधी वर्ग झाल्याने विद्युत खांब हटविण्याच्या कामाला लवकरच सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जळगावकर व्यक्त कऱत आहेत.

महावितरणच्या अधिकाऱ्यांचा ‘जळफळाट’

मनपाने हा निधी वर्ग केल्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता फारुक शेख यांच्याशी संपर्क साधून विद्युत खांब हटविण्याच्या कामाला सुरुवात केव्हा होईल, याबाबत विचारणा केली असताना, फारूक शेख यांना ५ लाख नागरिकांचा दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या प्रश्नाबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून आले. तसेच ‘लोकमत’कडून सातत्याने हा प्रश्न मांडून प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरल्याने फारुक शेख यांचा जळफळाट झालेला दिसून आला. तसेच मनपाने निधी वर्ग केल्यावरदेखील निधी वर्ग झाला नसल्याचे सांगत, कामाला केव्हा सुरुवात होईल याबाबत उत्तर देण्याचेही शेख यांनी टाळले.

कोट...

५ लाख नागरिकांच्या प्रश्नाबाबत आता महावितरण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. दीड कोटींचा निधी तत्काळ वर्ग करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला. आता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करून, कामाला लवकरच सुरुवात करणे गरजेचे आहे.

- गुलाबराव पाटील, पालकमंत्री

महावितरणकडूनच हे काम होणे गरजेचे होते. महावितरण प्रशासनाच्या ढिसाळ यंत्रणेमुळे या पुलाचे काम थांबले. मनपाने नागरिकांचा विचार करून, आपल्याकडील निधी महावितरणकडे वर्ग केला आहे. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांचे ढिसाळ काम पाहता या कामाला लवकर सुरुवात होईल हे सांगणेही कठीण आहे. आता आठवडाभरात या कामाला सुरुवात झाली नाही तर महावितरणविरोधात जोरदार आंदोलन करू.

- ॲड. दिलीप पोकळे, नगरसेवक