शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जळगावात तुळशी विवाहानंतर लग्न मुहूर्तांचा धुमधडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 17:17 IST

२० नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह झाला असला तरी १५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत गुरू लोप असल्याने विवाहास उपयुक्त दिवस नसल्याने विवाह इच्छुकांना १२ डिसेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

ठळक मुद्देयंदा वर्षभरात तब्बल ७१ लग्न मुहूर्त२० नोव्हेंबर रोजी झाला तुळशी विवाहमे २०१९ पर्यंत विवाहाच्या तारखा असल्याने शुभमंगल सावधान

अजय कोतकर

चाळीसगाव - दिवाळी संपल्यानंतर इच्छुक वधूवरांच्या आईवडिलांना वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. एकदाच का तुळशी विवाह झाला की, विवाह जुळविण्याचा सपाटा चालू होतो. २० नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह झाला असला तरी १५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत गुरू लोप असल्याने विवाहास उपयुक्त दिवस नसल्याने विवाह इच्छुकांना १२ डिसेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे. मात्र डिसेंबर ते मे २०१९ पर्यंत जवळपास ७१ तारखा लग्न मुहूतार्साठी योग्य असल्याचे मानले जाते.ग्रामीण भागात कुणी मुलगी देता का? हो असा प्रकार सध्या पहावयास मिळत आहे. वधूपेक्षा वरांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. वधूच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शेतकरी मुलगा नको, नोकरीला असला पाहिजे गाडी, बंगला सर्व काही व्यवस्थित असले पाहिजे अशा वाढत्या अपेक्षा असल्याने ग्रामीण भागात वरांच्या पालकांची मोठी डोकेदुखी झाली आहे.गेल्यावर्षी मे महिन्यात लग्न मुहूर्त नव्हते. सुटीचा महिना असून केवळ विवाह मुहूर्त नसल्याने अनेकांची अडचण झाली होती. परंतु यावर्षी मार्च, एप्रिल, मे या महिन्यात जास्तीत जास्त विवाह होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोजके मुहूर्त असल्याने वधू वरांच्या पालकांची धावपळ सुरू झाली आहे. चालू हंगामात मे २०१९ पर्यंत विवाहाच्या तारखा असल्याने वधू वरांना किमान ६ महिने तरी कोणतेही विघ्न नसल्याकारणाने शुभमंगल निर्विघ्नपणे पार पाडता येणार आहेत .

टॅग्स :Jalgaonजळगावmarriageलग्न