शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

जळगावात तुळशी विवाहानंतर लग्न मुहूर्तांचा धुमधडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 17:17 IST

२० नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह झाला असला तरी १५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत गुरू लोप असल्याने विवाहास उपयुक्त दिवस नसल्याने विवाह इच्छुकांना १२ डिसेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

ठळक मुद्देयंदा वर्षभरात तब्बल ७१ लग्न मुहूर्त२० नोव्हेंबर रोजी झाला तुळशी विवाहमे २०१९ पर्यंत विवाहाच्या तारखा असल्याने शुभमंगल सावधान

अजय कोतकर

चाळीसगाव - दिवाळी संपल्यानंतर इच्छुक वधूवरांच्या आईवडिलांना वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. एकदाच का तुळशी विवाह झाला की, विवाह जुळविण्याचा सपाटा चालू होतो. २० नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह झाला असला तरी १५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत गुरू लोप असल्याने विवाहास उपयुक्त दिवस नसल्याने विवाह इच्छुकांना १२ डिसेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे. मात्र डिसेंबर ते मे २०१९ पर्यंत जवळपास ७१ तारखा लग्न मुहूतार्साठी योग्य असल्याचे मानले जाते.ग्रामीण भागात कुणी मुलगी देता का? हो असा प्रकार सध्या पहावयास मिळत आहे. वधूपेक्षा वरांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. वधूच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शेतकरी मुलगा नको, नोकरीला असला पाहिजे गाडी, बंगला सर्व काही व्यवस्थित असले पाहिजे अशा वाढत्या अपेक्षा असल्याने ग्रामीण भागात वरांच्या पालकांची मोठी डोकेदुखी झाली आहे.गेल्यावर्षी मे महिन्यात लग्न मुहूर्त नव्हते. सुटीचा महिना असून केवळ विवाह मुहूर्त नसल्याने अनेकांची अडचण झाली होती. परंतु यावर्षी मार्च, एप्रिल, मे या महिन्यात जास्तीत जास्त विवाह होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोजके मुहूर्त असल्याने वधू वरांच्या पालकांची धावपळ सुरू झाली आहे. चालू हंगामात मे २०१९ पर्यंत विवाहाच्या तारखा असल्याने वधू वरांना किमान ६ महिने तरी कोणतेही विघ्न नसल्याकारणाने शुभमंगल निर्विघ्नपणे पार पाडता येणार आहेत .

टॅग्स :Jalgaonजळगावmarriageलग्न