शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

पत्त्यांचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:36 IST

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील साहित्यप्रेमी कौस्तुभ परांजपे

सकाळपासूनच माझी थोडी चुळबुळ सुरू होती. पण कोणाशी बोलावं काही कळत नव्हतं. बाबा दोन दिवसांकरिता बाहेरगावी गेले होते. नाहीतर त्यांच्याशी बोलून मन थोडं मोकळं करता आलं असतं.मित्राच्या घरी त्यांचे थोडे घरगुती वाद झाल्याने त्याच्या घरचं वातावरण थोडं गढूळ झालं होतं. त्यामुळे मी थोडा अस्वस्थ होतो. म्हणून कोणाशी बोलावं या विचारात होतो. माझी ही चुळबुळ कदाचित आजोबांच्या अनुभवी आणि चाणाक्ष नजरेने हेरली असेल असे वाटते. कारण त्यांनी शांतपणे मला बोलावलं, समोर बसवलं आणि पत्याचा कॅट काढून पत्ते वाटून म्हणाले, बस, जरा दोन डाव खेळ, फ्रेश वाटेल आणि विचारांना दिशा मिळेल.पत्ते लावताना ते जास्त काही बोलले नाहीत. मग हळूच म्हणाले, आपल्याकडे असलेल्या पत्त्यांमधून आपण चांगला डाव लावण्याचा प्रयत्न करत असतो. सगळे डाव चांगलेच येतात असे नाही. काही चांगले असतात, लवकर लागतात. काही थोडे अवघड असतात. उशिरा लागतात. पण लागतात हे नक्की. त्यासाठी आवश्यक त्या पत्यांची जुळवाजुळव करावी लागते. काही पत्ते सोडावे लागतात, तर काही टाकलेले किंवा ओढून उपयोगात येतील का? हे बघावे लागते.आपल्या आयुष्यात रोज उगवणारा दिवस असाच पत्याच्या डावासारखा आहे. काय सोडावे आणि काय धरावे याचा शांतपणे आणि योग्य विचार केल्यास रोजचा डाव चांगल्या पद्धतीने सोडवण्यास मदत होते. काही वेळा डावामध्ये आपण हुकूमसुद्धा बोलतो. आपल्याकडे भारी असलेले पत्ते हुकूमाच्या हलक्या पानापुढे निष्प्रभ ठरतात. पण यातूनच सावरायचे असते आणि पुढच्या चांगल्या डावाची प्रतीक्षा करायची असते.हे सगळे बोलून होईपर्यंत आमचे दोन डाव झाले होते. मग ते शांतपणे म्हणाले, दोन डावात तुझ्या लक्षात आले का? आपल्याकडून काही पत्ते सोडले जातात, काही टाकले जातात, तर काही दिले जातात.जे सोडतो ते दोघांच्याही उपयोगाचे नसतात. जे टाकतो ते कदाचित थोड्या कालावधीनंतर उपयोगात येणार असतात. असे पत्ते समोरचा उचलतो आणि जे देतो ते हमखास लगेचच उपयोगी आणि डाव लागायला कारणीभूत असतात व बऱ्याच वेळा आपल्याला हे माहितीसुद्धा असते.आपल्या रोजच्या जीवनातही येणाºया प्रसंगात देण्याची वृत्ती असावी. त्याने समस्या सुटायला मदत होते. ज्या गोष्टी अपायकारक किंवा निरूपयोगी आहेत त्या सोडून द्याव्यात. ज्या गोष्टींचा त्याग आत्ता केलातर चांगलेच होणार आहे त्या टाकून द्याव्यात.जेव्हा कोणाला संसारात, मैत्रीत साथ हवी असते त्यावेळी एकमेकांचा डाव लागेल असेच पत्ते (विचार, मदत, संयम, धैर्य) द्यावे. त्यामुळे आपला किंवा त्याचा डाव लागण्यास मदत होते. येथे एकमेकांशी स्पर्धा, ईर्ष्या असता कामा नये. स्पर्धेत मी नाही तर तीसुद्धा नाही, असा विचार असतो. पण रोजच्या डावात असा विचार ठेऊन चालत नाही.प्रत्येक डाव लागण्यासाठी थोडा वेळ हा द्यावाच लागतो. तुमच्या पिढीचा हाच त्रास आहे. तुम्हाला लगेचच निकाल अपेक्षित असतात. थोडा संयम ठेवण्याची वृत्ती तुमच्याकडे नाही. जुळवाजुळव किंवा काही अंशी तडजोड तुम्ही सहज स्वीकारत नाही. त्यामुळे मीच आणि माझेच बरोबर, असा ग्रह कदाचित निर्माण होऊन डाव विस्कटण्याची शक्यता असते.आता शांतपणे विचार कर आणि निर्णय घे. म्हणजे तुझी चुळबुळ थांबेल.आता मात्र मी मित्राकडे जाऊन शांतपणे सगळे ऐकून व समजावून घेईन व काय सोडायचे, काय टाकायचे व कोणी व काय द्यायचे हे ठरवून त्याचा डाव व्यवस्थित लावून देईन याबद्दल माझी खात्री झाली आहे. धन्यवाद आजोबा. पत्याच्या डावातून देणं, घेणं, सोडणं, जुळवणं व देणं घेणं व संयम दाखवणं हे शिकवल्याबद्दल, असे मी म्हणालो आणि मित्राकडे त्याचा डाव सावरायला बाहेर पडलो.-कौस्तुभ परांजपे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव