शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पत्त्यांचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:36 IST

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील साहित्यप्रेमी कौस्तुभ परांजपे

सकाळपासूनच माझी थोडी चुळबुळ सुरू होती. पण कोणाशी बोलावं काही कळत नव्हतं. बाबा दोन दिवसांकरिता बाहेरगावी गेले होते. नाहीतर त्यांच्याशी बोलून मन थोडं मोकळं करता आलं असतं.मित्राच्या घरी त्यांचे थोडे घरगुती वाद झाल्याने त्याच्या घरचं वातावरण थोडं गढूळ झालं होतं. त्यामुळे मी थोडा अस्वस्थ होतो. म्हणून कोणाशी बोलावं या विचारात होतो. माझी ही चुळबुळ कदाचित आजोबांच्या अनुभवी आणि चाणाक्ष नजरेने हेरली असेल असे वाटते. कारण त्यांनी शांतपणे मला बोलावलं, समोर बसवलं आणि पत्याचा कॅट काढून पत्ते वाटून म्हणाले, बस, जरा दोन डाव खेळ, फ्रेश वाटेल आणि विचारांना दिशा मिळेल.पत्ते लावताना ते जास्त काही बोलले नाहीत. मग हळूच म्हणाले, आपल्याकडे असलेल्या पत्त्यांमधून आपण चांगला डाव लावण्याचा प्रयत्न करत असतो. सगळे डाव चांगलेच येतात असे नाही. काही चांगले असतात, लवकर लागतात. काही थोडे अवघड असतात. उशिरा लागतात. पण लागतात हे नक्की. त्यासाठी आवश्यक त्या पत्यांची जुळवाजुळव करावी लागते. काही पत्ते सोडावे लागतात, तर काही टाकलेले किंवा ओढून उपयोगात येतील का? हे बघावे लागते.आपल्या आयुष्यात रोज उगवणारा दिवस असाच पत्याच्या डावासारखा आहे. काय सोडावे आणि काय धरावे याचा शांतपणे आणि योग्य विचार केल्यास रोजचा डाव चांगल्या पद्धतीने सोडवण्यास मदत होते. काही वेळा डावामध्ये आपण हुकूमसुद्धा बोलतो. आपल्याकडे भारी असलेले पत्ते हुकूमाच्या हलक्या पानापुढे निष्प्रभ ठरतात. पण यातूनच सावरायचे असते आणि पुढच्या चांगल्या डावाची प्रतीक्षा करायची असते.हे सगळे बोलून होईपर्यंत आमचे दोन डाव झाले होते. मग ते शांतपणे म्हणाले, दोन डावात तुझ्या लक्षात आले का? आपल्याकडून काही पत्ते सोडले जातात, काही टाकले जातात, तर काही दिले जातात.जे सोडतो ते दोघांच्याही उपयोगाचे नसतात. जे टाकतो ते कदाचित थोड्या कालावधीनंतर उपयोगात येणार असतात. असे पत्ते समोरचा उचलतो आणि जे देतो ते हमखास लगेचच उपयोगी आणि डाव लागायला कारणीभूत असतात व बऱ्याच वेळा आपल्याला हे माहितीसुद्धा असते.आपल्या रोजच्या जीवनातही येणाºया प्रसंगात देण्याची वृत्ती असावी. त्याने समस्या सुटायला मदत होते. ज्या गोष्टी अपायकारक किंवा निरूपयोगी आहेत त्या सोडून द्याव्यात. ज्या गोष्टींचा त्याग आत्ता केलातर चांगलेच होणार आहे त्या टाकून द्याव्यात.जेव्हा कोणाला संसारात, मैत्रीत साथ हवी असते त्यावेळी एकमेकांचा डाव लागेल असेच पत्ते (विचार, मदत, संयम, धैर्य) द्यावे. त्यामुळे आपला किंवा त्याचा डाव लागण्यास मदत होते. येथे एकमेकांशी स्पर्धा, ईर्ष्या असता कामा नये. स्पर्धेत मी नाही तर तीसुद्धा नाही, असा विचार असतो. पण रोजच्या डावात असा विचार ठेऊन चालत नाही.प्रत्येक डाव लागण्यासाठी थोडा वेळ हा द्यावाच लागतो. तुमच्या पिढीचा हाच त्रास आहे. तुम्हाला लगेचच निकाल अपेक्षित असतात. थोडा संयम ठेवण्याची वृत्ती तुमच्याकडे नाही. जुळवाजुळव किंवा काही अंशी तडजोड तुम्ही सहज स्वीकारत नाही. त्यामुळे मीच आणि माझेच बरोबर, असा ग्रह कदाचित निर्माण होऊन डाव विस्कटण्याची शक्यता असते.आता शांतपणे विचार कर आणि निर्णय घे. म्हणजे तुझी चुळबुळ थांबेल.आता मात्र मी मित्राकडे जाऊन शांतपणे सगळे ऐकून व समजावून घेईन व काय सोडायचे, काय टाकायचे व कोणी व काय द्यायचे हे ठरवून त्याचा डाव व्यवस्थित लावून देईन याबद्दल माझी खात्री झाली आहे. धन्यवाद आजोबा. पत्याच्या डावातून देणं, घेणं, सोडणं, जुळवणं व देणं घेणं व संयम दाखवणं हे शिकवल्याबद्दल, असे मी म्हणालो आणि मित्राकडे त्याचा डाव सावरायला बाहेर पडलो.-कौस्तुभ परांजपे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव