शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

अबब.... काय ही महागाई, कोरोनानंतर दीडपटीने वाढले किचनचे ‘बजेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे कोरोनाने वैद्यकीय, स्वच्छता यावरील खर्च वाढण्यासह उत्पन्नात कपात झाली असताना महागाई दररोज उच्चांकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे कोरोनाने वैद्यकीय, स्वच्छता यावरील खर्च वाढण्यासह उत्पन्नात कपात झाली असताना महागाई दररोज उच्चांकी गाठत असून, सामान्यांना जगणे कठीण होत आहे. कोरोनाचा संसर्ग पसरला त्या मार्च २०२० पासून ते आजपर्यंतचा महागाईचा चढता आलेख पाहिला तर दीडपटीने केवळ खाण्या-पिण्याचा खर्च वाढला आहे. वैद्यकीय उपचार, वीज बिल या खर्चाचा विचार केला तर कोठेच ताळमेळ बसताना दिसत नसून, बचत तर आता केवळ स्वप्नच राहू पाहत आहे.

मागणी व पुरवठ्यावर बाजारपेठेचे गणित अवलंबून असते. पुरवठा कमी झाला व मागणी वाढल्यास भाववाढ होणे स्वाभाविक असते. कोरोना काळापासून लॉकडाऊनच्या भीतीने मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ लागल्याने भाववाढ झाली ती नंतर मात्र काही कमी झाली नाही. सध्याच्या भाववाढीला या सोबतच सर्वांत महत्त्वाचे कारण ठरत आहे ते म्हणजे इंधन दरवाढ.

खाद्यतेलात कधी नव्हे एवढी वाढ

घर असो अथवा हॉटेल, या प्रत्येक ठिकाणी दररोज हमखास लागणारा घटक म्हणजे खाद्यतेल. महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला सर्वाधिक खर्च करावा लागत आहे तो एकट्या खाद्यतेलावर. त्यात यामध्येच कधी नव्हे एवढी मोठी वाढ दीड वर्षात झाली आहे. खाद्यतेलामध्ये सर्वाधिक वापर होतो तो सोयाबीन तेलाचा. या तेलाचे भाव कमी-जास्त झाले तरी ते ५ ते १० रुपयांच्या मर्यादेत असायचे. त्यामुळे हे तेल गेल्या काही वर्षांत ७५ ते ९५ रुपये प्रतिकिलोदरम्यान राहिले. मात्र, कोरोना सुरू झाल्यापासून मार्च २०२० ते सप्टेंबर २०२१ या दीड वर्षाच्या काळात या तेलाच्या भावात ६० रुपये प्रतिकिलोने वाढ होऊन ते थेट १५५ रुपयांपर्यंत पोहोचले. तीन वर्षांत २० रुपयांपर्यंतची वाढ असणाऱ्या या तेलाच्या भावात पूर्वीच्या वाढीच्या निम्म्या काळात तीनपटीने वाढ झाली, हे विशेष. शेंगदाणा तेलाचाही विचार केला तर या तेलातही ६० रुपये प्रतिकिलोने दीड वर्षात वाढ होऊन ते १९५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. खाद्यतेलातील ही भाववाढ सर्वांनाच चक्रावणारी आहे.