शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जळगाव जिल्ह्यातील ७८३ शेतकऱ्यांना ४ कोटीची कर्जमाफी; सर्वाधिक शेतकरी जामनेरचे

By सुनील पाटील | Updated: May 24, 2023 19:50 IST

धरणगाव तालुक्यातील अवघ्या एका शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला आहे.

जळगाव : जिल्ह्यातील महात्मा फुले कर्जमाफी योजनेपासून वंचित असलेल्या ७८३ शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफ केले असून ४ कोटी १७ लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना झाला आहे. यासंदर्भाचे सहकार विभागाचे आदेश जिल्हा बँकेला बुधवारी दुपारी प्राप्त झाले. सर्वाधिक ६७७ शेतकरी जामनेर तालुक्यातील असून त्याखालोखाल ७० शेतकरी चाळीसगाव तालुक्यातील आहेत. धरणगाव तालुक्यातील अवघ्या एका शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला आहे.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्ज माफी देण्यात येते. या योजनेच्या अंतर्गत कापूस, केळी ऊस आणि फळबागांची शेती करणारे शेतकरी तसेच पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता, त्याचा परिणाम म्हणून सर्वाधिक ६७७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील जळगाव तालुक्यातील दोन तर धरणगाव तालुक्याला फक्त एका शेतकऱ्याला लाभ मिळाला आहे. यावल तालुक्यातही एकाच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या चाळीसगाव तालुक्यातील ७० शेतकऱ्यांना लाभ मिळाला.

तालुकानिहाय शेतकरी व कर्जमाफीची रक्कम

  • तालुका   -  शेतकरी    -      कर्जमाफीची रक्कम
  • धरणगाव  -   ०१        -         ३१ हजार ७९४
  • चोपडा -        ०५     -             ५ लाख ३ हजार ५७९
  • एरंडोल-       ०३     -            २ लाख ३६ हजार १९८
  • चाळीसगाव  ७०      -      ४५ लाख ३८ हजार ९२७
  • जामनेर -      ६७७    -     ३ कोटी ४६ लाख ६४ हजार ३९९
  • यावल   -       ०१    -       ३८ हजार २५७
  • जळगाव -    ०२    -        १ लाख ४६ हजार ५७०
  • रावेर -          ०२   -        ७० हजार ६६४
  • अमळनेर - ०२    -         १ लाख १३९ रुपये
  • भुसावळ  - ०६   -       ४ लाख ५२ हजार ५०७
  • बोदवड -   ०८    -         ४ लाख २५ हजार ४२३
  • मुक्ताईनगर ०६   -      ५ लाख ३३ हजार ९२१ 
टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी