शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

विजेची तार तुटून पडल्याने येथील ३२ शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 21:53 IST

बंदिस्त असलेल्या ३२ शेळ्यांवर मुख्य विजेची तार तुटून पडल्याने त्या पशुधनाचा तडफडून मृत्यू होऊन लाखोंचे नुकसान झाले.

ठळक मुद्देबांबरुड येथील घटना, शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क

कुरंगी, ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या बाबरूड राणीचे येथील गाव शिवारातील एका भिल्ल समाजाचा ज्येष्ठ नागरिकाच्या बंदिस्त असलेल्या ३२ शेळ्यांवर मुख्य विजेची तार तुटून पडल्याने त्या पशुधनाचा तडफडून मृत्यू होऊन लाखोंचे नुकसान झाले.

घटनास्थळी महावितरण, पोलीस व पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते तर ‘महसूल’चे अधिकारी अनुपस्थित होते. दि. १२ एप्रिलला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बांबरुड राणीचे येथील राजाराम सखाराम भिल्ल (६८) यांच्या मालकीच्या १० बोकड, २२ शेळ्या अशा एकूण ३२ शेळ्या भूमिहिन असलेले राजाराम भिल हे संसाराचा गाडा हाकत होते. जुन्ने शिवारात व वनविभागाला लागून शेतावर बसवलेल्या असताना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास मुख्य विजेची लाईनवरील क्लँम तुटल्यामुळे विजेचा तार खाली पडल्यामुळे शेतातील ३२ बकरी जागेवरच तडफडून मरण पावल्या.

मोठी घटना टळली

राजाराम भिल्ल हे ज्या ठिकाणी राहत होते, त्या ठिकाणी झोपडीत रात्री वन्यप्राण्यांच्या बचावासाठी त्या शेळ्यांना कोंडून ठेवत होते व दररोज सकाळी झोपडी शेजारी तारेचे वाॅल कंपाैंड केलेले होते, त्याठिकाणी त्या शेळ्यांना ठेवत होते. दररोजच्या नियमानुसार शेळ्या तार कंपाैंडमध्ये टाकल्यानंतर व राजाराम भिल्ल हे झोपडीतील साफसफाई करून सकाळचा चहा करत असतानाच मोठा किंचाळण्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर बघितले तर ३२ शेळ्या यांच्या अंगावर विजेची तार पडून त्या तडफडत मृत्यू पावत होते तर तेथेच एका निंबाच्या झाडाखाली एक दुधाळ गाय, वासरू बाधलेले होते.

तुटलेली विजेची तार त्या निंबावर पडल्याने गाय, वासरू व राजाराम भिल्ल हे बालंबाल बचावले. घटनास्थळी ‘महावितरण’चे लासलगाव उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता दीपक बानबाकूडे, लाईनमन अनिल मिस्तरी, वासुदेव पाटील, प्रेमचंद राठोड, अकिल मेवाती यांनी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश बारी, युवराज चौधरी यांनी जागेवर मृत झालेल्या पशुधनाचे शवविच्छेदन केले.

पोलीस प्रशासनाचे सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. एवढी मोठी घटना घडली असताना महसूल विभागाची अनुपस्थिती दिसून आली. मृत झालेल्या शेळ्यांची आजच्या बाजारभावानुसार ४.५० लाखांचे नुकसान झाले असून ते त्वरित मिळावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPachoraपाचोराFarmerशेतकरी