शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

२५० परप्रांतीय बांधव गावी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 1:04 PM

७ बसेसद्वारे भुसावळला रवाना

जळगाव : लॉकडाउनमुळे जळगावात अडकलेले पश्चिम बंगालमधील २५० परप्रांतीय बांधव रविवारी रात्री पश्चिम बंगालला रवाना झाले. भुसावळहून श्रमिक एक्सप्रेसने ते गावाकडे रवाना झाले.जळगावातील सराफ बाजारात पश्चिम बंगालमधील वेगवेगळ््या जिल्ह्यातील परप्रांतीय बांधव गेल्या अनेक वर्षांपासून कामानिमित्त या ठिकाणीच स्थायिक झाले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बंगाली कारागिरांनीदेखील घराकडे परतायला सुरूवात केली आहे. रविवारी जळगावहून बंगाली कारागिर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मायटी यांनी येथील बंगाली कारागिरांना बंगालमध्ये रवाना करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर रविवारी हे बंगाली आपल्या कुटुंबासह गावाकडे रवाना झाले. जळगाव आगारातून ७ बसेसद्वारे या बांधवांना भुसावळला रवाना करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्वेता संचेती, आगार व्यवस्थापक नीलेश पाटील, वाहतूक अधिक्षिका नीलिमा बागूल आदी उपस्थित होते. एस. टी. बसने या बांधवांना भुसावळ रेल्वे स्टेशनपर्यंत सोडण्यात आले. त्या ठिकाणाहून रात्री अकरा वाजता श्रमिक एक्सप्रेसने हे मजूर गावाकडे रवाना झाले. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर पुन्हा जळगावात परतणार असल्याचे महेंद्र मायटी यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव