शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळातील १४ हजार गुन्हे रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST

शासनाचा निर्णय : नागरिकांना मिळणार दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊन काळात ...

शासनाचा निर्णय : नागरिकांना मिळणार दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४ हजार ६३० जणांवर जिल्ह्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते, आता हे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या लोकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बहुतांश जणांनी जागेवरच दंड भरलेले होते तर काही जणांचे प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आले होते.

मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर २५ मार्च पासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. एप्रिल ते ऑगस्ट या काळात कडक लॉकडाऊन होते. विना परवानगी बाहेर फिरायलाही तेव्हा बंदी होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद होत्या. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठीच हा नियम लागू करण्यात आला होता. ज्या लोकांनी नियमांचे उल्लंघन केले, त्यांच्यावर प्रशासनाने कलम १८८, जमावबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. याअंतर्गत जागेवर दोनशे रुपयांचाही दंड आकारण्यात आला होता. दुकानदारांवर कारवाया करुन त्यांचे प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली होती. विना पास प्रवास करणाऱ्या लोकांवर तसेच वाहनांवरही कारवाया करण्यात आल्या. त्या काळात जिल्ह्यात ३१ ठिकाणी सिमा तपासणी नाके उभारण्यात आली होती.

विना परवानगी बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक

१) परवानी नसताना अनावश्यकरित्या घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक होते. ९ हजार ८३६ जणांवर कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांकडून दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्याशिवाय पास नसतानाही एका तालुक्यातून, जिल्ह्यातून दुसऱ्या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या १ हजार १६२ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांची वाहने जप्त करण्यात आली होती.

२) लॉकडाऊन काळात एकूण १४ हजार ६३० जणांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून २० लाख ३६ हजार ११८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. काही जणांनी न्यायालयात दंड भरला आहे.

३) याशिवाय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शहरातून एक लाखापेक्षा जास्त वाहने गेली. सर्वाधिक वाहने ही राष्ट्रीय महामार्गावरुन गेली. राज्यमार्गाचाही वापर काही वाहनधारकांनी केला. शासनाने आदेश दिल्यानंतर आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून या वाहनांना अडविण्यात आले होते. नंतर शासनाच्या बसेस मधून प्रवाशांना दुसऱ्या राज्याच्या सिमेपर्यंत पोहचविण्यात आले.

कोट...

गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासनाचे आदेश अजून तरी प्राप्त झालेले नाहीत. प्रस्ताव न्यायालयात पाठवायचा की शासनाकडे हे देखील शासनच ठरविणार आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसारच पुढील कारवाई केली जाईल.

-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक

लॉकडाऊन काळात दाखल गुन्हे : १४६३०

विना परवानगी घराबाहेर पडणे : ९८३६

जास्त वेळ दुकान सुरु ठेवणे : ७८२

विना परवानगी प्रवास करणे : ११६२

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे : २८५०