शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

९ वर्षांपासून रखडली नदीजोडची १४ कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:14 IST

२० कोटींच्या निधीची अपूर्ण कामांसाठी गरज : नियोजनमधून निधी देण्याची गरज ; लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष

जळगाव : पावसाळ्यात ठराविक नदी, नाल्यांना येणाऱ्या पुराचे पाणी वाहून जाते. त्याऐवजी या नद्या, नाले व कालवे जोडून पाण्याचे पुनर्भरण करणे ही योजना संकल्पित करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून २००८-०९ मध्येच या योजनेंतर्गत नदीजोडची २८ कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील १४ कामे पूर्णही करण्यात आली. मात्र त्यानंतर नियोजन विभागाने २०१० मध्ये घालून दिलेल्या अटीमुळे उर्वरित १४ अपूर्ण राहिलेल्या कामांसाठी निधी अर्थसंकल्पित होऊनही तो या कामांसाठी संबंधीत यंत्रणेला उपलब्ध करून देता आलेला नाही. त्यामुळे तब्बल ९ वर्षांपासून नदीजोडची ही कामे रखडली आहेत.नद्या-नाल्यांचे पुराचे वाया जाणारे पाणी वळवून अवर्षणप्रवण भागातील नदी-नाल्यांमध्ये सोडून तेथील पाणीटंचाई देखील दूर करण्यासाठी नदी, नाले जोड योजनेची संकल्पना पुढे आली. हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी विजयकुमार सिंघल यांनी या कामात विशेष लक्ष घालून कामांना गती दिली.या योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे २००८-०९ व २००९-१० या आथिरक वषारत २२ कोटी ८७ लाख इतक्या अंदाजित किंमतीच्या २८ कामांना मंजुरी दिली. त्यासाठी २००८-०९ या आर्थिक वर्षात ७ कोटी आणि २००९-१० या आर्थिक वर्षात ११ कोटी १० लाख असा १८ कोटी १० रूपये इतका निधी शासनाकडून प्राप्त होऊन खर्चसुद्धा झाला आहे. २०१०-११ या आर्थिक वर्षात ४ कोटी ५६ लाख इतका निधी अर्थसंकल्पित झाला होता.परंतु शासनाने निश्चित केलेल्या १४७ योजनांच्या यादीत समावेश नसलेल्या योजनांवर खर्च करण्यात येऊ नये, अशा सूचना नियोजन विभागाने २५ जून २०१० च्या पत्रान्वये दिल्या होत्या. त्यामुळे नदीजोड प्रकल्पासाठी तरतूद असूनही सन २०१०-११ मध्ये निधी खर्च करता आला नाही.रखडलेल्या कामांसाठी २० कोटींची गरजतब्बल १४ कामे गेल्या ९ वर्षांपासून अर्धवट होऊन रखडली आहेत.अपूर्ण कामांसाठी लागणाºया खर्चात वाढ होऊन आता ही रक्कम २० कोटींवर गेली आहे. जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असतानाही लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. नव्याने पालकमंत्रीपदाची धुरा हाती घेतलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या कामांसाठी नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.आता हेड तयार झाले पण लघुपाटबंधारे विभागाकडूनप्रस्तावच आलेला नाही.नियोजनमधील हेडच केले होते रद्दनदीजोड प्रकल्पावर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी खर्च करण्यासाठी असलेले हेडच शासनाने रद्द केले होते. त्यामुळे नियोजन समितीकडे निधी उपलब्ध असून सुद्धा नदीजोडसाठी त्याची तरतूद करता येत नव्हती. नियोजन समितीच्या बैठकीत याबाबत सदस्यांकडून सातत्याने मागणी होत होती. अखेर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्रस्ताव देण्याची सूचना केली होती. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यावरून नदीजोडचे हेड पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता या हेडखाली नदीजोडच्या कामांसाठी नियोजनमधून तरतूद करणे शक्य होणार आहे.मक्तेदारांचे पैसेही अडकलेमंजुरी मिळालेल्या नदीजोडच्या २८ कामांपैकी १४ कामे पूर्ण झाली असून १४ कामे अर्धवट अवस्थेत बंद पडली आहेत. तसेच या कामांच्या मक्तेदारांची बिले देखील थकली आहेत. गेल्या ७-८ वर्षांपासून या मक्तेदारांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. अर्धवट अवस्थेतील कामे पूर्ण न केल्यास त्यावर झालेला कोट्यवधींचा खर्चही वाया जाणार आहे. तसेच दुष्काळावर मात करण्यासाठीची ही उपाययोजना असफल होणार आहे. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव