शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

‘मधुकर’च्या १ लाख क्विंटल साखरेचा अखेर लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST

फैजपूर, ता.यावल : शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट थकवल्यामुळे मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल ...

फैजपूर, ता.यावल : शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट थकवल्यामुळे मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल होती व त्यांच्या आदेशान्वये मंगळवारी कारखान्यातील १ लाख १४ हजार क्विंटल साखरेचा लिलाव पार पडला.

या ऑनलाइन लिलाव प्रक्रियेत आठ विविध एजन्सींनी भाग घेतला होता. यात एम.के.सी.एल या कंपनीने २९ कोटी ६९ लाख ८२ हजार ४४१ रूपयात कर विरहित लिलाव घेतला. आता येत्या ४५ दिवसात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत सर्व रक्कम न्यायालयात जमा केली जाणार आहे. यातून प्राधान्याने शेतकऱ्यांची व अन्य देणी चुकती होणे अपेक्षित आहे. तर या व्यवहारामुळे कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

सहकार क्षेत्रातील प्रकल्प मधुकर सहकारी साखर कारखाना असून या कारखान्याच्या गेल्या दोन वर्षांपासून अडचणी वाढल्या आहेत. कारखान्याकडे ऊस गाळप हंगाम २०१८/१९ मधील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची एफआरपीप्रमाणे देयक रक्कम व त्या रकमेवर १५ टक्केप्रमाणे १५ कोटी ८० लाख रुपये थकीत होते. सन २०१८/१९ मध्ये राज्य शासनाकडून वेळीच थकहमी न मिळाल्याने जिल्हा बँकेकडून ऊस पुरवठादार शेतकऱ्याचे पेमेंट अदा करण्यासाठीचे कर्ज मिळू शकले नाही. म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली होती. तर या थकीत रक्कम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पीटिशन १४४५४ हे २०१९ मध्ये दाखल करण्यात आले होते. साखर आयुक्त पुणे यांनी महसूल विभागास महसुलाची थकबाकी समजून कारखान्यात उपलब्ध साठा जप्त करावा, असे आदेश गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिले होते. कोरोना काळात या निकालावर अपिल प्रक्रिया पूर्ण झाली व आता नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मधुकर सहकारी साखर कारखान्यातील १ लाख १४ हजार क्विंटल साखरेचा लिलाव करण्याचे आदेश काढले होते व त्या नुसार संचालक मंडळाकडून सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करीत मंगळवारी ऑनलाइन लिलाव पार पडला.

पैसे न्यायालयात जमा करणार

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार लिलाव पूर्ण झाला व आता ४५ दिवसात संपूर्ण साखर उचल प्रक्रिया पूर्ण होत लिलावाची रक्कम प्राप्त होईल व ती संपूर्ण रक्कम २९ कोटी ६९ लाख ८२ हजार ४४१ न्यायालयात जमा केली जाईल.

उर्वरित रकमेचा न्यायालय घेणार निर्णय

२९ कोटी ६९ लाख ८२ हजार ४४१ या लिलाव रकमेतून १५ कोटी ८० लाख शेतकऱ्यांची देणी आहे. तर कामगारांकरिता १६ कोटी अपेक्षित आहेत. तसेच बँकांचे सुमारे ५५ कोटींचे कर्ज देखील थकले आहे. तेव्हा उर्वरित रक्कम कोणास द्यावी हा न्यायालय निर्णय घेऊ शकते.

कारखाना भाडे तत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा होणार

कामगारांचे थकीत वेतन दिले गेले पाहिजे व त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, या उद्देशाने संचालक मंडळाने कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. ती प्रक्रियादेखील लवकरच पूर्ण होत येत्या हंगामात कारखाना सुरू होणे अपेक्षित आहे.

-शरद महाजन, चेअरमन, मसाका.