शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

‘मधुकर’च्या १ लाख क्विंटल साखरेचा अखेर लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST

फैजपूर, ता.यावल : शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट थकवल्यामुळे मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल ...

फैजपूर, ता.यावल : शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट थकवल्यामुळे मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल होती व त्यांच्या आदेशान्वये मंगळवारी कारखान्यातील १ लाख १४ हजार क्विंटल साखरेचा लिलाव पार पडला.

या ऑनलाइन लिलाव प्रक्रियेत आठ विविध एजन्सींनी भाग घेतला होता. यात एम.के.सी.एल या कंपनीने २९ कोटी ६९ लाख ८२ हजार ४४१ रूपयात कर विरहित लिलाव घेतला. आता येत्या ४५ दिवसात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत सर्व रक्कम न्यायालयात जमा केली जाणार आहे. यातून प्राधान्याने शेतकऱ्यांची व अन्य देणी चुकती होणे अपेक्षित आहे. तर या व्यवहारामुळे कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

सहकार क्षेत्रातील प्रकल्प मधुकर सहकारी साखर कारखाना असून या कारखान्याच्या गेल्या दोन वर्षांपासून अडचणी वाढल्या आहेत. कारखान्याकडे ऊस गाळप हंगाम २०१८/१९ मधील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची एफआरपीप्रमाणे देयक रक्कम व त्या रकमेवर १५ टक्केप्रमाणे १५ कोटी ८० लाख रुपये थकीत होते. सन २०१८/१९ मध्ये राज्य शासनाकडून वेळीच थकहमी न मिळाल्याने जिल्हा बँकेकडून ऊस पुरवठादार शेतकऱ्याचे पेमेंट अदा करण्यासाठीचे कर्ज मिळू शकले नाही. म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली होती. तर या थकीत रक्कम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पीटिशन १४४५४ हे २०१९ मध्ये दाखल करण्यात आले होते. साखर आयुक्त पुणे यांनी महसूल विभागास महसुलाची थकबाकी समजून कारखान्यात उपलब्ध साठा जप्त करावा, असे आदेश गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिले होते. कोरोना काळात या निकालावर अपिल प्रक्रिया पूर्ण झाली व आता नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मधुकर सहकारी साखर कारखान्यातील १ लाख १४ हजार क्विंटल साखरेचा लिलाव करण्याचे आदेश काढले होते व त्या नुसार संचालक मंडळाकडून सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करीत मंगळवारी ऑनलाइन लिलाव पार पडला.

पैसे न्यायालयात जमा करणार

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार लिलाव पूर्ण झाला व आता ४५ दिवसात संपूर्ण साखर उचल प्रक्रिया पूर्ण होत लिलावाची रक्कम प्राप्त होईल व ती संपूर्ण रक्कम २९ कोटी ६९ लाख ८२ हजार ४४१ न्यायालयात जमा केली जाईल.

उर्वरित रकमेचा न्यायालय घेणार निर्णय

२९ कोटी ६९ लाख ८२ हजार ४४१ या लिलाव रकमेतून १५ कोटी ८० लाख शेतकऱ्यांची देणी आहे. तर कामगारांकरिता १६ कोटी अपेक्षित आहेत. तसेच बँकांचे सुमारे ५५ कोटींचे कर्ज देखील थकले आहे. तेव्हा उर्वरित रक्कम कोणास द्यावी हा न्यायालय निर्णय घेऊ शकते.

कारखाना भाडे तत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा होणार

कामगारांचे थकीत वेतन दिले गेले पाहिजे व त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, या उद्देशाने संचालक मंडळाने कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. ती प्रक्रियादेखील लवकरच पूर्ण होत येत्या हंगामात कारखाना सुरू होणे अपेक्षित आहे.

-शरद महाजन, चेअरमन, मसाका.