शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

युवकांनी बौद्धिक संपदा वाढविण्यावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:50 IST

शेतीतील अवलंबित्व कमी करुन समाजातील युवकांनी बौद्धिक संपदा वाढण्यिावर भर देण्याची गरज आहे. आजचे युग हे स्पर्धेचे आहे. युवकांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करीत गुणवत्तेच्या आधारे वेगळे अस्तित्व निर्माण करावे, असे मत तंजावर संस्थानचे श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.

ठळक मुद्देश्रीमंत बाबाजी राजेभोसले : सर्व घटकांना सोबत घेऊन प्रगती साधण्याची गरज

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतीतील अवलंबित्व कमी करुन समाजातील युवकांनी बौद्धिक संपदा वाढण्यिावर भर देण्याची गरज आहे. आजचे युग हे स्पर्धेचे आहे. युवकांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करीत गुणवत्तेच्या आधारे वेगळे अस्तित्व निर्माण करावे, असे मत तंजावर संस्थानचे श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.शहाजीराजे भोसले यांचे १३ वे वशंज बाबाजीराजे, हे जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी ऐतिहासिक संदर्भ आणि सद्यस्थिती यावर आपले परखड मत व्यक्त केले. बाबाजीराजे हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची देशातील अग्रगण्य आयटी कंपनी आहे. जी-सॅप या परदेशी कंपनीशी स्पर्धा करते. शहाजीराजे भोसले यांनी ३५० वर्षांपूर्वी तंजावर प्रांत पादाक्रांत केला होता. अनेक वर्षे या प्रांतात भोसले घराण्याचे राज्य होते. तंजावर प्रांत आता तिरुवारु, नागपट्टम, तंजावर, अधरंगे आणि नाथटर या चार जिल्ह्यांत विभागला गेला आहे. या भागात छत्रम ट्रस्ट या नावाने विश्वस्त नेमून आजही तेथील गरजू आणि गरीब लोकांना आरोग्य, शिक्षण आदी सेवा दिली जात आहे.बाबाजीराजे म्हणाले की, तंजावर प्रांतात ३५० वर्षांची परंपरा आजतागायत सुरू आहे. तिथल्या संस्कृतीत आम्ही मिसळलो. सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन प्रगती साधत आहोत. महाराष्ट्रात तोच कित्ता गिरवला जावा. काळानुसार आता समाजाने बदलणे गरजेचे आहे. तरच समाजातील प्रत्येक घटक प्रगती करु शकेल. युवकांनी बौद्धिक संपदा विकसित आणि वाढविण्यावर भर देण्याच्या दृष्टिने सजग राहिले पाहिजे.आज स्पर्धेचे जग असून, ज्यात गुणवत्ता असेल तोच यापुढे टिकू शकणार आहे. त्यामुळे शिक्षण आणि गुणवत्ता या दोन्ही बाबी आत्मसात करुन युवकांनी वाटचाल केली पाहिजे. नोकºयांवर अवलंबून न राहता युवक, मुलींनी कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे. जेणेकरुन रोजगार निर्माण होऊन समाजातील अन्य बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल. तसेच उद्योग व्यवसायात उतरावे, असेही बाबाजीराजे म्हणाले.३५० वर्षांची परंपरा...भोसले घराण्याची ३२ गावांत १३ हजार एकर शेती आहे. ही बटई दिलेली असून, या शेतीतून मिळणारे उत्पन्न समाजाच्या कल्याणासाठी खर्च केले जाते. याला ३५० वर्षांची परंपरा असून, याकामी तेथील राज्य शासनाने दोन तहसीलदार व एक जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी ट्रस्टला दिला आहे. यातून त्यांचे मानधनही दिले जात असल्याचे बाबाजीराजे भोसले यांनी सांगितले.छत्रम ट्रस्टचे कार्यतंजावर प्रांतात १३ हजार एकर शेती असून, यात विविध प्रकारचे उत्पादन घेतले जाते. त्यातून मिळणाºया उत्पन्नाद्वारे छत्रम ट्रस्ट कार्य करते. वसतिगृह, शाळा, महाविद्यालय चालविले जात आहेत. वसतिगृहात १२०० मुले राहतात. तसेच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत आरोग्यसेवा दिली जाते.