शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

युवकांनी बौद्धिक संपदा वाढविण्यावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:50 IST

शेतीतील अवलंबित्व कमी करुन समाजातील युवकांनी बौद्धिक संपदा वाढण्यिावर भर देण्याची गरज आहे. आजचे युग हे स्पर्धेचे आहे. युवकांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करीत गुणवत्तेच्या आधारे वेगळे अस्तित्व निर्माण करावे, असे मत तंजावर संस्थानचे श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.

ठळक मुद्देश्रीमंत बाबाजी राजेभोसले : सर्व घटकांना सोबत घेऊन प्रगती साधण्याची गरज

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतीतील अवलंबित्व कमी करुन समाजातील युवकांनी बौद्धिक संपदा वाढण्यिावर भर देण्याची गरज आहे. आजचे युग हे स्पर्धेचे आहे. युवकांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करीत गुणवत्तेच्या आधारे वेगळे अस्तित्व निर्माण करावे, असे मत तंजावर संस्थानचे श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.शहाजीराजे भोसले यांचे १३ वे वशंज बाबाजीराजे, हे जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी ऐतिहासिक संदर्भ आणि सद्यस्थिती यावर आपले परखड मत व्यक्त केले. बाबाजीराजे हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची देशातील अग्रगण्य आयटी कंपनी आहे. जी-सॅप या परदेशी कंपनीशी स्पर्धा करते. शहाजीराजे भोसले यांनी ३५० वर्षांपूर्वी तंजावर प्रांत पादाक्रांत केला होता. अनेक वर्षे या प्रांतात भोसले घराण्याचे राज्य होते. तंजावर प्रांत आता तिरुवारु, नागपट्टम, तंजावर, अधरंगे आणि नाथटर या चार जिल्ह्यांत विभागला गेला आहे. या भागात छत्रम ट्रस्ट या नावाने विश्वस्त नेमून आजही तेथील गरजू आणि गरीब लोकांना आरोग्य, शिक्षण आदी सेवा दिली जात आहे.बाबाजीराजे म्हणाले की, तंजावर प्रांतात ३५० वर्षांची परंपरा आजतागायत सुरू आहे. तिथल्या संस्कृतीत आम्ही मिसळलो. सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन प्रगती साधत आहोत. महाराष्ट्रात तोच कित्ता गिरवला जावा. काळानुसार आता समाजाने बदलणे गरजेचे आहे. तरच समाजातील प्रत्येक घटक प्रगती करु शकेल. युवकांनी बौद्धिक संपदा विकसित आणि वाढविण्यावर भर देण्याच्या दृष्टिने सजग राहिले पाहिजे.आज स्पर्धेचे जग असून, ज्यात गुणवत्ता असेल तोच यापुढे टिकू शकणार आहे. त्यामुळे शिक्षण आणि गुणवत्ता या दोन्ही बाबी आत्मसात करुन युवकांनी वाटचाल केली पाहिजे. नोकºयांवर अवलंबून न राहता युवक, मुलींनी कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे. जेणेकरुन रोजगार निर्माण होऊन समाजातील अन्य बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल. तसेच उद्योग व्यवसायात उतरावे, असेही बाबाजीराजे म्हणाले.३५० वर्षांची परंपरा...भोसले घराण्याची ३२ गावांत १३ हजार एकर शेती आहे. ही बटई दिलेली असून, या शेतीतून मिळणारे उत्पन्न समाजाच्या कल्याणासाठी खर्च केले जाते. याला ३५० वर्षांची परंपरा असून, याकामी तेथील राज्य शासनाने दोन तहसीलदार व एक जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी ट्रस्टला दिला आहे. यातून त्यांचे मानधनही दिले जात असल्याचे बाबाजीराजे भोसले यांनी सांगितले.छत्रम ट्रस्टचे कार्यतंजावर प्रांतात १३ हजार एकर शेती असून, यात विविध प्रकारचे उत्पादन घेतले जाते. त्यातून मिळणाºया उत्पन्नाद्वारे छत्रम ट्रस्ट कार्य करते. वसतिगृह, शाळा, महाविद्यालय चालविले जात आहेत. वसतिगृहात १२०० मुले राहतात. तसेच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत आरोग्यसेवा दिली जाते.