शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी बौद्धिक संपदा वाढविण्यावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:50 IST

शेतीतील अवलंबित्व कमी करुन समाजातील युवकांनी बौद्धिक संपदा वाढण्यिावर भर देण्याची गरज आहे. आजचे युग हे स्पर्धेचे आहे. युवकांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करीत गुणवत्तेच्या आधारे वेगळे अस्तित्व निर्माण करावे, असे मत तंजावर संस्थानचे श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.

ठळक मुद्देश्रीमंत बाबाजी राजेभोसले : सर्व घटकांना सोबत घेऊन प्रगती साधण्याची गरज

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतीतील अवलंबित्व कमी करुन समाजातील युवकांनी बौद्धिक संपदा वाढण्यिावर भर देण्याची गरज आहे. आजचे युग हे स्पर्धेचे आहे. युवकांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करीत गुणवत्तेच्या आधारे वेगळे अस्तित्व निर्माण करावे, असे मत तंजावर संस्थानचे श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.शहाजीराजे भोसले यांचे १३ वे वशंज बाबाजीराजे, हे जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी ऐतिहासिक संदर्भ आणि सद्यस्थिती यावर आपले परखड मत व्यक्त केले. बाबाजीराजे हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची देशातील अग्रगण्य आयटी कंपनी आहे. जी-सॅप या परदेशी कंपनीशी स्पर्धा करते. शहाजीराजे भोसले यांनी ३५० वर्षांपूर्वी तंजावर प्रांत पादाक्रांत केला होता. अनेक वर्षे या प्रांतात भोसले घराण्याचे राज्य होते. तंजावर प्रांत आता तिरुवारु, नागपट्टम, तंजावर, अधरंगे आणि नाथटर या चार जिल्ह्यांत विभागला गेला आहे. या भागात छत्रम ट्रस्ट या नावाने विश्वस्त नेमून आजही तेथील गरजू आणि गरीब लोकांना आरोग्य, शिक्षण आदी सेवा दिली जात आहे.बाबाजीराजे म्हणाले की, तंजावर प्रांतात ३५० वर्षांची परंपरा आजतागायत सुरू आहे. तिथल्या संस्कृतीत आम्ही मिसळलो. सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन प्रगती साधत आहोत. महाराष्ट्रात तोच कित्ता गिरवला जावा. काळानुसार आता समाजाने बदलणे गरजेचे आहे. तरच समाजातील प्रत्येक घटक प्रगती करु शकेल. युवकांनी बौद्धिक संपदा विकसित आणि वाढविण्यावर भर देण्याच्या दृष्टिने सजग राहिले पाहिजे.आज स्पर्धेचे जग असून, ज्यात गुणवत्ता असेल तोच यापुढे टिकू शकणार आहे. त्यामुळे शिक्षण आणि गुणवत्ता या दोन्ही बाबी आत्मसात करुन युवकांनी वाटचाल केली पाहिजे. नोकºयांवर अवलंबून न राहता युवक, मुलींनी कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे. जेणेकरुन रोजगार निर्माण होऊन समाजातील अन्य बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल. तसेच उद्योग व्यवसायात उतरावे, असेही बाबाजीराजे म्हणाले.३५० वर्षांची परंपरा...भोसले घराण्याची ३२ गावांत १३ हजार एकर शेती आहे. ही बटई दिलेली असून, या शेतीतून मिळणारे उत्पन्न समाजाच्या कल्याणासाठी खर्च केले जाते. याला ३५० वर्षांची परंपरा असून, याकामी तेथील राज्य शासनाने दोन तहसीलदार व एक जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी ट्रस्टला दिला आहे. यातून त्यांचे मानधनही दिले जात असल्याचे बाबाजीराजे भोसले यांनी सांगितले.छत्रम ट्रस्टचे कार्यतंजावर प्रांतात १३ हजार एकर शेती असून, यात विविध प्रकारचे उत्पादन घेतले जाते. त्यातून मिळणाºया उत्पन्नाद्वारे छत्रम ट्रस्ट कार्य करते. वसतिगृह, शाळा, महाविद्यालय चालविले जात आहेत. वसतिगृहात १२०० मुले राहतात. तसेच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत आरोग्यसेवा दिली जाते.