शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

ओबीसी समाजासमोरील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:30 AM

माळी समाजाच्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळालेला आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून, समाजाने पाठींबा दिल्याने विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे प्रतिपादन कैलास गोरंट्याल यांनी केले.

ठळक मुद्देकैलास गोरंट्याल : समता परिषदेच्या मेळाव्याचे साक्षीदार

जालना : तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी जालना येथे परिषदेचा पहिला मेळावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना आरक्षण मिळवून दिले होते. या घटनेचा मी आणि डॉ. पंडितराज धानुरे हे साक्षीदार आहेत. माळी समाजाच्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळालेला आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून, समाजाने पाठींबा दिल्याने विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे प्रतिपादन कैलास गोरंट्याल यांनी केले.जालना विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांना सावता परिषद आणि समता परिषदेच्या बैठकीत पाठींबा देण्यात आला. गोरंट्याल यांना मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. जालना तालुक्यातील १७ गावातील सावता आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा जालना येथील प्रचार कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, माजी आमदार शकुंतला शर्मा, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुषमा खरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी मनोगत व्यक्त करीत गोरंट्याल यांना विजयी करण्याचा निर्धार केला.बैठकीस नितीन इंगळे, सुभाष गिराम, एकनाथ घोलप, राम गिराम, बबलू बडदे, एकनाथ राऊत, दिलीप गिराम, गणेश खरात, गणेश तिडके, गजानन खरात, अरुण घडलिंग, गोविंद खरात यांच्यासह सावता परिषद, समता परिषदेसह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन डॉ. विशाल धानुरे यांनी केले.

टॅग्स :JalanaजालनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस