शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

पिकेच काय, जमीन पण वाहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 3:56 PM

 पूर्णा, धामणा, केळणाचा प्रथमच पाहिला रुद्रावतार

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान 

- प्रकाश मिरगे

जाफराबाद (जि. जालना) : ज्या पावसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, त्या पावसाचा यंदा कहर झाला. अतिवृष्टीमुळे पूर्णा, धामणा, केळणा नद्यांचा रुद्रावतार प्रथमच पाहिला. नदीच्या पुरात पिकेच काय आमच्या जमिनीही वाहून गेल्या. शासन तुटपुंजी मदत करेल; पण अस्मानी संकटात आमचे झालेले नुकसान भरून निघेल का? असा प्रश्न जाफराबाद तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.

जाफराबाद तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे बाजरी, मका, कपाशी, कापूस, सोयाबीन आदी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांची बैठक घेऊन दिले. तालुक्यातील १०१ गावांपैकी ४४ गावात पंचनामे झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित दोन दिवसात ५७ गावांचे पंचनामे पूर्ण करणार असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. 

नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जाफराबाद शिवारातील शेतीची पाहणी केली असता विदारक चित्र दिसून आले. अतिवृष्टीमुळे पूर्णा-धामना, केळणा नदीला पूर आला होता. या पुरात पिकासह जमीन वाहून गेली. या अस्मानी संकटाचा कहर बोरखेडी गायकी, सावंगी, टाकली, जाफराबाद, खामखेडा, नळविहरा, निमखेडा, पिंपळखुटा, देऊळझरी येथे पाहावयास मिळाला. 

सर्जेराव वरगणे, सय्यद अब्बास, फकिरबा वरगणे, सय्यद युसूफ, उषा वरगणे, बोरखेडी गायके येथील पंढरीनाथ शामराव गायके आदी शेतकऱ्यांची पिकेच नव्हे तर जमीनही या पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करताना जमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना अधिकची मदत करावी, अशी मागणी शामराव गायके यांनी केली आहे.

४४ गावांतील पंचनामेतालुक्यातील १०१ गावातील ५८ हजार ८०९ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. आजवर ४४ गावांतील पंचनामे पूर्ण झाले. यात ३० हजार ५८१ हे. क्षेत्रातील २३ हजार ३८६ शेतकऱ्यांना ३३ टक्क्यांपेक्षा अधिक फटका बसला आहे. उर्वरित ५७ गावांतील पंचनामे करण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण होणार असून, अंतिम अहवाल त्यानंतर समोर येईल. -सतीश सोनी, तहसीलदार जाफराबाद

घास हिरावून घेतलाशेतकऱ्यांनी केलेला खर्च पाण्यात गेला असून, तोंडचा घास हिरावून घेतल्याने दिवाळीसुद्धा साजरी करता आली नाही. त्यामुळे शासनाने सरसगट जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, जमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करावी.  - कृष्णा मोरे, शेतकरी, नळविहरा

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस