शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 08:58 IST

"राजकीय इच्छाशक्ती असेल तर २ तासांत कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात", मनोज जरांगे  मराठवाडा दौऱ्यावर रवाना.

पवन पवार, वडीगोद्री ( जालना): "आंदोलक म्हणून आशा बाळगणे माझे कर्तव्य असून आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासह अंतरवाली सराटीमधील सर्व गुन्हे मागे घेतील," असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसंच राजकीय इच्छाशक्ती असेल तर ७ दिवस नाही, २ तासांत कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठवाडा दौऱ्यावर जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मराठवाडा दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून आज सकाळी ७:१५ वाजता रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील हिंगोली दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत हिंगोलीत आज मराठा समाजाची महाएल्गार शांतता रॅली निघणार आहे. एकटाच्या लढण्यात आणि करोडोंच्या लढण्यात खूप शक्ती असेत, त्यामुळे मराठा समाजाने या शांतता रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नसल्याचं जरांगे यांनी १३ तारखेनंतर पुढची दिशा काय या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे

"छगन भुजबळ त्यांच्या लोकांना सांगून, त्यांना पदांचे आमिष दाखवून आमच्या मराठा सामजाच्या शांतता रॅलीत काही करायला लावतील," असा संशय जरांगे यांनी व्यक्त केलाय. जर आमच्या शांतता रॅलीत काही झाले तर त्याला छगन भुजबळ आणि सरकार जबाबदार राहील असं जरांगे म्हणाले. मोठ्या वाहनांचा ताफा घेऊन जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून मराठवाडा दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणjalna-acजालनाOBC Reservationओबीसी आरक्षण