शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटी देऊनही कंत्राटदार न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:28 IST

एजन्सीने जवळपास ४०० किलोमीटरपेक्षा अधिक पाईपलाईन अंथरली. त्यापोटी पालिकेने एक अब्ज रूपये संबंधित कंत्राटदाराला दिले होते. परंतु आणखी जवळपास पाच कोटी रुपये वाढवून द्यावेत यासाठी कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी २०१२ मध्ये २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यासाठी पैठण येथील जायकवाडी धरणातून जालन्याच्या वेशीपर्यंत पाणी आणले होते. परंतु हे पाणी जालन्यातील विविध विभागात पोहोचविण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी नाशिक येथील एका एजन्सीला हे कंत्राट दिले होते. या एजन्सीने जवळपास ४०० किलोमीटरपेक्षा अधिक पाईपलाईन अंथरली. त्यापोटी पालिकेने एक अब्ज रूपये संबंधित कंत्राटदाराला दिले होते. परंतु आणखी जवळपास पाच कोटी रुपये वाढवून द्यावेत यासाठी कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली आहे.जालना शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जायकवाडी योजना कार्यान्वित केली होती. ही योजना अत्यंत खर्चिक असून, त्यात पुन्हा अंबड पालिकेला पाणी देण्याचा मुद्दा समाविष्ट करण्यात आल्याने जालना पालिकेची डोकेदुखी कायम आहे. आज अंबड पालिकेकडून जालना पालिकेला पाणी घेण्यासाठी ठरलेली रक्कम देत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. जालन्यासाठी जायकवाडी योजनेतून अंबड मार्गावरील इंदेवाडी येथील जलकुंभापर्यंत पाणी आले होते. परंतु नंतर हे पाणी जालन्यातील विविध भागात पोहोचविण्यासाठी नव्याने अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या.त्यानुसार हे काम नाशिक येथील एका एजन्सीला देण्यात आले. या एजन्सीने गेल्या दोन वर्षात शहराच्या विविध भागांत पाणी पुरविण्यासाठी जलवाहिनी अंथरण्यात आली. या कामापोटी संबंधित कंत्राटदारास पालिकेने आतापर्यंत ९९ लाख रूपयांपेक्षा अधिकची रक्कम बिल म्हणून दिली आहे.परंतु ही कमी असल्याचे कारण पुढे करत संबंधित एजन्सीीने आणखी अतिरिक्त पाच कोटी रूपयांची वाढीव रक्कम द्यावी, अशी मागणी पालिकेकडे केली. परंतु पालिकेने ती मान्य केली नाही. त्यामुळे त्या एजन्सी चालकाने थेट न्यायालयात धाव घेतली आहे.ज्यावेळी या योजनेचे टेंडर झाले, त्यावेळचे दर आणि नंतर केलेल्या कामांचे दर हे चालू बाजारभावाप्रमाणे द्यावे अशी मागणी करण्यात आली. परंतु ९९ लाख रूपये देऊनही जर आणखी वाढीव रक्कम देणे आम्हाला आर्थिक दृष्ट्या परवडत नाही, असे पालिकेचे म्हणणे आहे. त्यातच हे देयक संबंधित कंत्राटदाराला देताना थर्ड पार्टी आॅडिट केल्यावरच ते दिल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.योजना : घनकचऱ्यासाठी अडीच कोटी मंजूरजालन्यातील सामनगाव येथील घनकचरा प्रकल्प चक्क दहा वर्षानंतरही या ना त्या कारणाने रखडलेला आहे. पूर्वी हा प्रकल्प १६ कोटी रूपयांचा होता. परंतु त्यात काही त्रुटी राहिल्याने जालना पालिकेने वाढीव नवीन डीपीआर मंजूर करण्यासाठीचा प्रस्ताव पाठिविला होता.त्यानुसार आता या प्रकल्पासाठी वाढीव दोन कोटी ७१ लाख रूपये मंंजूर झाले असून, हे काम आता लवकरात लवकर पूर्ण होईल, यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदWaterपाणीCourtन्यायालय