शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

स्थायी समितीत गाजला पाणी टंचाईचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:07 IST

दुष्काळाच्या अखेरच्या टप्प्यात असून, अद्यापही प्रशासनाने ही आश्वासने पूर्ण केले नाही. त्यामुळे प्रशासनाची गत बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात अशी झाली आहे. असा सूर स्थायी समितीच्या सभेत निघाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येणाऱ्या टंचाई काळात दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात घेता जि.प. प्रशासन टंचाई निवारणार्थ टँकर, विहिर अधिग्रहण, चर खोदणे, जनावरांना पिण्याचा पाण्याची व्यवस्था करणे तसेच मजुरांच्या हाताला काम देऊ, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु, आज आपण दुष्काळाच्या अखेरच्या टप्प्यात असून, अद्यापही प्रशासनाने ही आश्वासने पूर्ण केले नाही. त्यामुळे प्रशासनाची गत बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात अशी झाली आहे. असा सूर स्थायी समितीच्या सभेत निघाला.सोमवारी जिल्हा परिषदे स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, सर्व सभापती, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांच्यासह स्थायी समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. स्थायी समितीचे सदस्य जयमंगल जाधव यांनी दुष्काळी मुद्यावर अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की, या अगोदर तीन ते चार बैठका झाल्या. प्रत्येक बैठकीत दुष्काळाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी दुष्काळाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. जिल्ह्यात टँकरचे नियोजन, जनावरांना पाण्याची व्यवस्था, जि.प. मध्ये दुष्काळ कक्षाची स्थापना, अशी आश्वासने प्रशासनाने दिले होते. दुष्काळाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तरीही उपाय योजना सुरू असल्याचे दिसून येते.सदस्य संतप्तशालीकराम म्हस्के यांनीही प्रशासनाला दुष्काळाच्या मुद्यावरुन धारेवर धरले. ते म्हणाले की, प्रशासनाने दुष्काळी नियोजनाची नुसती चर्चा केली. काम मात्र शून्य केले. यामुळे आज जनावरांना व नागरिकांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाही.जिल्हा परिषदेच्या कार्यालयात प्रशासन दुष्काळी कक्षाची स्थापन करणार होते. परंतु, ते ही प्रशासनाने केले नाही. यावरुन प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे. अधिकारी प्रस्ताव पाठविण्यासाठी ८ ते ९ दिवसांचा कालावधी लावत आहे. याकडे अध्यक्षांनी लक्ष देण्याची गरज आहे.बीड जिल्ह्यात प्रत्येक जि.प. गटात चारा छावणी सुरु करण्यात आली आहे. परंतु, जालना जिल्ह्यात फक्त १३ चारा छावण्यांना मंजुरी मिळाली आहे. या चारा छावण्यांमुळे १५ ते १६ हजार जनावरांचा प्रश्न मिटत असून, ४ लाख ७२ हजार जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आहे.यावरुन जिल्हा प्रशासनाची दुष्काळाबाबतची उदासिनता दिसून येते. सध्या काही गावांमध्ये नागरिकांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाही तर काही गावांमध्ये २१ दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी जगावे कसे, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई