शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

जालन्यावर वरुणराजाचा कहर सुरूच; अनेकांच्या घरांत पाणी, २६ जणांना पुरातून वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:27 IST

दहा महसूल मंडळांत अतिवृष्टी : अनेकांच्या घरांत पाणी, संसार उघड्यावर, व्यापाऱ्यांनाही फटका

जालना : जिल्ह्याच्या विविध भागांत सोमवारी पहाटेच्या सुमारास दमदार पाऊस झाला. दहा महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शहरी, ग्रामीण भागातील अनेकांच्या घरांत पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आला आहे. शिवाय दुकानांत पुन्हा पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांनाही फटका बसला आहे. या पावसामुळे विरेगाव, हिवर्डी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या २६ जणांची सुटका अग्निशमन दल, ‘एनडीआरएफ’च्या पथकाकडून करण्यात आली आहे.

जालना शहर मंडळात ७६.८ मिमी, सेवली- १११.८ मिमी, रामनगर- ७६.८ मिमी आणि पाचनवडगाव महसूल मंडळात ७६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जालना शहरासह तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जालना शहरातील भाग्यनगर, गांधीनगर, सुंदरनगरसह इतर अनेक भागांतील घरांत पाणी पुन्हा शिरले होते. तर व्यापाऱ्यांच्या दुकानांतही पाणी शिरले होते. तर हिवर्डी गावच्या शिवारातील शेतात १४ लोकं अडकले होते. एकीकडून ओढा आणि दुसरीकडे नदी अशा स्थिती असलेल्या या सहा महिला व आठ पुरुषांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप पाण्याबाहेर काढले. तर विरेगाव येथेही अशाच स्थितीत विरेगावमधून १२ जण अडकले होते. त्यांना ‘एनडीआरएफ’च्या पथकाने सुरक्षित बाहेर काढले. या दोन्ही घटनास्थळांना आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी भेट देऊन आढावा घेतला; तसेच पूरग्रस्तांना दिलासा दिला. यावेळी तहसीलदार छाया पवार व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

३० जनावरेही वाचविलीविरेगाव येथील शेतातील पाण्याच्या विळख्यात ३० जनावरेही अडकली होती. या ३० जनावरांना प्रशासकीय पथकांनी सुरक्षितरीत्या बाहेर काढले.

खोतकर, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीजालना शहरासह ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी पाहणी करून आढावा घेतला. पूरग्रस्तांना मदत करीत धीर देण्याचे कामही केले. त्याशिवाय नुकसानीचे पंचनामे वेळेत करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

या मंडळांत अतिवृष्टीजालना शहर मंडळात ७६.८ मिमी, सेवली- १११.८ मिमी, रामनगर- ७६.८ मिमी आणि पाचनवडगाव महसूल मंडळात ७६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अंबड तालुक्यातील जामखेड महसूल मंडळात ६८.३ मिमी, तर राेहिलागड मंडळात ६५.३ मिमी पाऊस झाला आहे. सुखापुरी महसूल मंडळात ६७ मिमी पावसाची नोंद झाली. बदनापूर महसूल मंडळात ६५.८ मिमी, सेलगाव- ६५.८ मिमी आणि रोषणगाव महसूल मंडळात ६५.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करासतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके पूर्णत: शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. व्यापारीवर्गासह सर्वसामान्य, गोरगरिबांनाही या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी, व्यापाऱ्यांसह गोरगरीब नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी आ. अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याची माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख शैलेश घुमारे यांनी दिली.

आजवर झालेला पाऊसतालुका- टक्केवारीजालना- १२०बदनापूर- १२७भोकरदन- ११२जाफराबाद- १२२परतूर- १०७मंठा- १०२अंबड- १२८घनसावंगी- १३१

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रfloodपूर