शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

वचक संपला...जालन्यात मुंबई-कल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST

गेल्या वर्षभरापासून जालना शहर चांगलेच चर्चेत आले आहे. याचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांवर प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे होत आहे. शहरात ...

गेल्या वर्षभरापासून जालना शहर चांगलेच चर्चेत आले आहे. याचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांवर प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे होत आहे. शहरात व्यापार, उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे काही मूठभर चुकीच्या नागरिकांनी आपल्या लाभासाठी वाट्टेल ते करून लाभ उचलण्याची जणूकाही सुपारीच घेतली आहे. यामुळे अनेक गट-तट पडले असून, यातूनच गोळीबार होणे, गावठी कट्टे सापडणे, चोरी, दरोड्यांचे प्रकार वाढले आहेत. यातून वर्दीचा धाक कमी झाल्याचे समोर येत आहे. पूर्वी वर्दीतील एक माणूस दिसला तरी मोठा जमाव शांत होत होता. आज तसे चित्र दुर्मीळ होताना दिसून येत आहे.

समृद्धी महामार्ग जालना शहराजवळून गेल्याने जवळपास एकट्या जालन्यात ७०० कोटी रूपयांपेक्षा अधिकचा मावेजा मिळाला आहे. त्यातून ऐन मंदीतही जिल्ह्यात सर्वत्र अर्थसंपन्न वातावरण होते. आलेल्या या पैशांची योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी जमीन खरेदीचे व्यवहार वाढले. यातूनच स्पर्धा होऊन अनेकजण या-ना त्या मार्गाने एकमेकांची उणीदुणी काढताना दिसत आहेत. कुठल्याही मुद्यावरून ब्लॅकमेल करून पैसा ओरबाडण्याचे जणूकाही शहरात पेव फुटले आहे. या व्यावसायिक स्पर्धेतून गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचे दिसून येते. वाळूचा अवैध उपसा असो की, दोन दिवसांपूर्वी येथील व्यापाऱ्याच्या अपरहणाच्या मुद्यावरून जालना पुन्हा चर्चेत आले आहे.

या आधी देखील बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सिंघवी यांच्यावर गोळीबाराच्या घटनांना उजाळा मिळाला आहे. त्या सर्व प्रकरणांमध्ये देखील पोलिसांकडून अपेक्षित असणारा सडेतोड तपास लागलेला नाही. यासह शहरातील खासगी सावकारी वाढली असून, यावर कोणी तक्रार करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. एकूणच बहुतांश राजकीय पक्षांकडून गुंड प्रवृत्तीना मिळणारे संरक्षण आणि पोलिसांची ढीलाई यामुळे गुन्हेगारीला एक प्रकारे प्रतिष्ठा मिळत असल्याचे चित्र सध्या जिल्हाभरात निर्माण होत आहे. हे कुठे तरी थांबवून शहरातील गुन्हेगारांचा कणा शोधून त्याचा बिमोड करण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या नेत्यासमोर निर्माण झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.