शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पर्यायी स्त्रोतांचा वापर करून मुबलक वीजपुरवठा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:44 AM

वीज वितरण कंपनीकडून आता पर्यायी स्त्रांतांचा म्हणजे पवन, सौर उर्जा निर्मितीला प्राधान्य देऊन राज्यातील वीज ग्राहकांना २४ तास योग्य दाबाने अविरत वीजपुरवठा करण्यासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज वितरण कंपनीकडून आता पर्यायी स्त्रांतांचा म्हणजे पवन, सौर उर्जा निर्मितीला प्राधान्य देऊन राज्यातील वीज ग्राहकांना २४ तास योग्य दाबाने अविरत वीजपुरवठा करण्यासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या आहेत. भविष्यातही या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर करून वीज निर्मितीचा खर्च कमी करून पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद सरकारकडून केली असल्याची माहिती महावितरण कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी बुधवारी येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात वीजेची मागणी थेट २५००० मॅगावॅटवर पोहचली होती. यापूर्वी २०१७ मध्ये ही मागणी उंचावली होती. महाराष्ट्रात आज घडीला ५००० मॅगावॅटचे प्रकल्प पूर्णत्वास जाणे शिल्लक असल्याची खंत यावेळी पाठक यांनी केली. राज्याच्या इतर विभागाच्या विकासाच्या बाबतील समतोतल पाहता मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांना दोन वर्षापूर्वी जाहीर केलेली एक हजार कोटीची सवलत पुढेही सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.दरम्यान सौरउर्जेला वीजवितरण कंपनीकडून प्राधान्य दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राळेगण सिध्दी तसेच यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे पथदर्शी प्रकल्प राबविले जात आहेत. त्यातून केवळ दोन रूपये ८५ पैसे युनिट दराने वीज मिळणार असल्याचे ते म्हणाले. सौर अटल बिहारी योजना सुरू असून, सहा हजार कृषीपंप दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महावितरण कंपनीच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मोठ्या उद्योजकांपेक्षा आमच्या प्रकल्पांना ग्राहक प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज