शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी- उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:33 IST

दुष्काळात शिवसेना शेतकºयांना वा-यावर सोडणार नाही. शेतक-यांच्या खांद्याला, खांदा लावून शेतक-यांना मदत करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बदनापूर येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : दुष्काळात शिवसेना शेतकºयांना वा-यावर सोडणार नाही. शेतक-यांच्या खांद्याला, खांदा लावून शेतक-यांना मदत करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बदनापूर येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात केले.येथील चाणक्य मंगल कार्यालयात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शेतक-यांना जनावरांसाठी पशुखाद्य वाटप करण्यात आले़यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, यापूर्वीच्या दुष्काळातही शेतक-यांना मदत व्हावी याकरीता आंदोलन करणारी शिवसेनाच होती. राज्याच्या ताकदीसमोर केंद्रशासनाला झुकावे लागले. शेतक-यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. शेतक-यांना माफी कशी करता त्यांना कर्जमुक्त करा, असा टोला ठाकरे यांनी केंद्र सरकारला लावला. मी आज राजकारण करायला आलो नाही. जनावरांना चारा नाही, पाण्यावाचून गुरे तडफडताहेत जनावरांना चारापाणी कोण देणार? राज्यात शेतक-यांना कर्जमाफी मिळेना, मात्र कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटण्यातच ३२ हजार कोटी कर्जमाफीचे गेले. मात्र याचा हिशोब सरकार देत नाही. प्रधानमंत्री पिकविमा, प्रधानमंत्री फळबाग अशा विविध योजना अंतर्गत शेतकºयांनी कोट्यवधी रुपये शासनाकडे भरले. मात्र शेतक-यांना तुटपुंजा विमा मंजूर करण्यात आला आहे. तर बहुतांश शेतक-यांना विमाच मिळाला नसल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. याला केंद्र आणि राज्य शासन जबाबदार असल्याचे ठाकरे यांनी टोला लावला. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भगवी शाल देऊन स्वागत केले. यावेळी जि.प अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, जयप्रकाश चव्हाण, जि.प. सदस्य कैलास चव्हाण, गणेश डोळस, भगवान कदम, राजेंद्र ज-हाड राजेश जºहाड, गोरख लांबे, विलास पवार, भरत मदन, संजय बळप, अंबादास कोळसकर, मिर्झा शकूर बेग, नंदकिशोर दाभाडे, रवि बोचरे, श्रीराम कान्हेरे, अरूण डोळसे, राम पाटील आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.पंतप्रधान सोलापूरला आले मला अपेक्षा होती, ते दुष्काळासाठी काही मोठी घोषणा करून शेतक-यांना दिलासा देतील पण असे काही झाले नाही. यामुळे देशाचे पंतप्रधान शेतकºयांविषयी किती गंभीर आहेत, यावरुन दिसून येत असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी यावेळी केली. यामुळे तुम्ही शिवसेना पक्षाच्या पाठीमागे उभे राहा, तुमच्या ताकदीवरच जे करता येईल, ते शिवसेना करेल असे यावेळी ठाकरे म्हणाले.यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.पशुखाद्य वाटपशिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतक-यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. मराठवाड्यातील दुष्काळात शेतक-यांच्या जनावरांसाठी १०० ट्रक पशुखाद्य वाटप करण्यासाठी आणले आहेत. दुष्काळग्रस्त शेतक-यांना पाऊस पडेपर्यंत जास्तीत जास्त मदत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे करणार असल्याचे वचन दिले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेdroughtदुष्काळFarmerशेतकरी