शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती जपणाऱ्या सुषमा स्वराज यांना जालन्यात मान्यवरांकडून श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:47 IST

सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने एक सुसंस्कृत राजकारणी महिला काळाच्या पडद्याआड गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राजकारणात राहूनही अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी, अमोघ वक्तृत्व यामुळे भारतीय जनता पक्षाची मुलख मैदानी तोफ म्हणून ओळख असलेल्या भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने एक सुसंस्कृत राजकारणी महिला काळाच्या पडद्याआड गेली आहे.भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. स्व. इंदिरा गांधीनंतर स्वराज यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या जाण्याने भाजपसह भारतीय राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचा आपण नेहमीच चाहता होतो.- राजेश राऊत, उपनगराध्यक्षसुषमा स्वराज आणि माझा संबंध हा गेल्या तीस वर्षापासूनचा होता. या तीस वर्षाच्या काळात त्यांच्याकडून अनेक महत्त्वाच्या बाबी शिकण्यास मिळाल्या. राजकारण करत असतानाच त्या अत्यंत भावूक व्यक्ती म्हणूनही परिचित होत्या. विरोधकांवर तुटून पडताना त्यांनी सत्याची बाजू कधी सोडली नाही. परराष्ट्र मंत्री असताना अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांनी देशाचे नाव जगभर उंचावले. - रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्रीपक्षात काम करत असताना दिल्ली, मुंबई येथे जाण्याचे योग आले होते. या भेटी दरम्यान त्यांच्याशी तीस वर्षापूर्वीच ओळख झाली होती. त्यांच्यासमोर आम्ही नवखे होतो. परंतु त्यांनी आम्हाला त्याची जाणीव कधी होऊ दिली नाही. सुषमा स्वराज यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाने एक प्रकारे मोठा हिरा गमावला आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून न निघणारी आहे.- बबनराव लोणीकर, पालकमंत्रीसुषमा स्वराज यांचा आपल्यावरचा प्रभाव हा खूप जुना आहे. आपण महाविद्यालयात असताना त्यांना जालन्यात एका कार्यक्रमासाठी बोलाविले होते. एकूणच त्यांचे साधे परंतु तेवढेच प्रभावी व्यक्तिमत्त्व नागरिकांवर छाप पाडून जात असे. कुठल्याही मुद्याचा अभ्यास करून त्यावर थेट चर्चा करण्याची त्यांची तयारी असे. मुळात एक विधिज्ञ असल्याने दोन्ही बाजू ऐकून घेण्याची त्यांची खुबी होती. - अर्जुन खोतकर, राज्यमंत्रीआपण शिवसेनेत असलो तरी सुषमा स्वराज या आपल्या आवडत्या नेत्या होत्या. त्यांचे संसदेतील आणि प्रचार सभा दरम्यानच्या भाषणांना आपण आवर्जून अभ्यासले आहे. महाविद्यालयीन जीवनात त्या जालन्यात आल्या असतानाच्या आठवणी त्यांच्या जाण्याने आजही ताज्या झाल्या आहेत. राजकारण करताना महिलांनी न्यूनगंड न बाळगता धडाडीने केले पाहिजे, अशी त्यांची नेहमीच अपेक्षा राहिली होती. - भास्कर अंबेकर, माजी नगराध्यक्ष

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजDeathमृत्यूRaosaheb Danweरावसाहेब दानवेBabanrao Looneykarबबनराव लोणीकरArjun Khotkarअर्जुन खोतकर