शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

संस्कृती जपणाऱ्या सुषमा स्वराज यांना जालन्यात मान्यवरांकडून श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:47 IST

सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने एक सुसंस्कृत राजकारणी महिला काळाच्या पडद्याआड गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राजकारणात राहूनही अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी, अमोघ वक्तृत्व यामुळे भारतीय जनता पक्षाची मुलख मैदानी तोफ म्हणून ओळख असलेल्या भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने एक सुसंस्कृत राजकारणी महिला काळाच्या पडद्याआड गेली आहे.भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. स्व. इंदिरा गांधीनंतर स्वराज यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या जाण्याने भाजपसह भारतीय राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचा आपण नेहमीच चाहता होतो.- राजेश राऊत, उपनगराध्यक्षसुषमा स्वराज आणि माझा संबंध हा गेल्या तीस वर्षापासूनचा होता. या तीस वर्षाच्या काळात त्यांच्याकडून अनेक महत्त्वाच्या बाबी शिकण्यास मिळाल्या. राजकारण करत असतानाच त्या अत्यंत भावूक व्यक्ती म्हणूनही परिचित होत्या. विरोधकांवर तुटून पडताना त्यांनी सत्याची बाजू कधी सोडली नाही. परराष्ट्र मंत्री असताना अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांनी देशाचे नाव जगभर उंचावले. - रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्रीपक्षात काम करत असताना दिल्ली, मुंबई येथे जाण्याचे योग आले होते. या भेटी दरम्यान त्यांच्याशी तीस वर्षापूर्वीच ओळख झाली होती. त्यांच्यासमोर आम्ही नवखे होतो. परंतु त्यांनी आम्हाला त्याची जाणीव कधी होऊ दिली नाही. सुषमा स्वराज यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाने एक प्रकारे मोठा हिरा गमावला आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून न निघणारी आहे.- बबनराव लोणीकर, पालकमंत्रीसुषमा स्वराज यांचा आपल्यावरचा प्रभाव हा खूप जुना आहे. आपण महाविद्यालयात असताना त्यांना जालन्यात एका कार्यक्रमासाठी बोलाविले होते. एकूणच त्यांचे साधे परंतु तेवढेच प्रभावी व्यक्तिमत्त्व नागरिकांवर छाप पाडून जात असे. कुठल्याही मुद्याचा अभ्यास करून त्यावर थेट चर्चा करण्याची त्यांची तयारी असे. मुळात एक विधिज्ञ असल्याने दोन्ही बाजू ऐकून घेण्याची त्यांची खुबी होती. - अर्जुन खोतकर, राज्यमंत्रीआपण शिवसेनेत असलो तरी सुषमा स्वराज या आपल्या आवडत्या नेत्या होत्या. त्यांचे संसदेतील आणि प्रचार सभा दरम्यानच्या भाषणांना आपण आवर्जून अभ्यासले आहे. महाविद्यालयीन जीवनात त्या जालन्यात आल्या असतानाच्या आठवणी त्यांच्या जाण्याने आजही ताज्या झाल्या आहेत. राजकारण करताना महिलांनी न्यूनगंड न बाळगता धडाडीने केले पाहिजे, अशी त्यांची नेहमीच अपेक्षा राहिली होती. - भास्कर अंबेकर, माजी नगराध्यक्ष

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजDeathमृत्यूRaosaheb Danweरावसाहेब दानवेBabanrao Looneykarबबनराव लोणीकरArjun Khotkarअर्जुन खोतकर