शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

मुसळधार पावसाने झोडपले; वाहतूक ठप्प, शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 17:29 IST

rain in Jalana : कपाशी , सोयाबीन , तूर ,बाजरी या पिकांसह मोसंबी आणि डाळिंब अशी फळपिकेही धोक्यात आली आहेत.

ठळक मुद्देगोंदी, वडीगोद्री, सुखापुरी शिवाराला पावसाने झोडपलेअंबड तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे 

अंबड ( जालना ) :  तालुक्यातील  गोंदी , वडीगोद्री , सुखापुरी मंडळात सोमवारी पावसाने पुन्हा झोडपून काढले. तालुक्यातील अनेक  गावांत पिके पाण्यात गेली आहेत. गोदावरी व इतर नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी संपर्क  तुटलेला आहे.

तालुक्यात मागील आठवडाभरापासून पाऊस  ठाण मांडून आहे. दरम्यान, सोमवारी व मंगळवारी पहाटेच   शिवारात जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसाने शेतात खरीप पिके  पाण्यात गेली आहेत. तालुक्यात  गोदावरी नदी, गल्हाटी नदीला पूर आला आहे. मंगला , लेंडी नदी, चांदसुरा नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. वडीगोद्री मंडळात 133 मिमी तर गोंदी मंडळात 160 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गल्‍हाटी नदीला पूर आल्‍याने आधीच्या पूर परिस्थितीने त्रस्त झालेल्या पिठोरी सिरसगाव, घुंगर्डे हादगाव येथील ग्रामस्थांचे पुन्हा पूर  स्थितीमुळे जीवन विस्कळीत झाले आहे. महसूल प्रशासनाने  तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.  महागडी बियाणे, खते व औषधींचा खर्च करून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. कपाशी , सोयाबीन , तूर ,बाजरी या पिकांसह मोसंबी आणि डाळिंब अशी फळपिकेही धोक्यात आली आहेत.

Flood : मांजरा नदी काठावर अडकलेल्या २५ जणांची सुटका; बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण

जायकवाडी धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या आणि आरक्षित पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे. नदी-नाले ओसांडून भरले असून अनेक गावांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. जोरदार पावसाने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत  मोठी वाढ झाली आहे. एकूणच अतिपावसाने पिके पिवळी पडून करपत आहेत. - जोरदार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने या भागात वस्तुनिष्ठ पीक पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली

दि. 28 सप्टेंबर रोजी  सकाळी आठ वाजेपर्यंत अंबड तालुक्यातील सात महसुल मंडळात खालीलप्रमाणे पाऊस (मी.मी.) पडला आहे.गोंदी 160,वडीगोद्री -133 ,रोहिलागड -  45 ,,सुखापुरी 164 , धनगर पिंप्री 90 , अंबड - 77 ,जामखेड - 40  मिमी पावसाची नोंद झाली.बहुतांश भागांमध्ये सध्या पाऊस कोसळत आहे. 

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाagricultureशेती