शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

जमावबंदीच्या अंमलबजावणीला नागरिक, प्रशासनाकडून तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:29 IST

जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १४ हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यापैकी १३ हजार ६०० पेक्षा अधिक रुग्ण बरेही झाले ...

जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १४ हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यापैकी १३ हजार ६०० पेक्षा अधिक रुग्ण बरेही झाले आहेत. यामुळे दिलासा मिळून सर्वजण आपापल्या कामांमध्ये व्यस्त झाले होते. कोरोना हद्दपार झाला या अविर्भावात सर्वजण होते, परंतु पंधरा दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली. त्यामुळे चिंताही वाढली.

कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये म्हणून पुन्हा ट्रेसेसिंग तसेच अलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे झाले आहे. मध्यंतरी सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर नव्याने सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. हे सर्व प्रशासन करण्यास तत्पर आहे. परंतु मास्क आणि सॅनिटायझरसह स्वच्छतेकडे पुन्हा दुर्लक्ष होताना दिसत आहे. सर्रासपणे बाजारपेठ तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांवर देखील नागरिक नियम पाळत नसल्याने पुन्हा एकदा झपाट्याने हा कोरोना फैलू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.

वातावरण बदलानेही सर्दीचे रुग्ण वाढले

गेल्या आठवडाभरापासून रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन पडत आहे. त्यातच दोन ते तीन दिवसांपासून थंड वारे आणि अवकाळी पावसाने वातावरणात अचानक बदल झाले आहेत. काही गावांमध्ये गारपीट झाली आहे. या वातावरणातील बदलामुळे देखील अनेक गावांमध्ये लहान-मोठ्यांना सर्दीचा त्रास जाणवत आहे.

सर्दीकडे दुर्लक्ष नको

वातावरणातील बदल तसेच पिण्याच्या पाण्यातील बदलांमुळे देखील सर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे. सर्दी झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले असून, सर्दी तसेच दोन ते तीन दिवस ताप असेल तर लगेचच चाचणी करून घेतल्यास पहिल्याच टप्प्यात असलेला कोरोना लक्षात येऊन त्यावरील उपाय करणे शक्य होतात. दुर्लक्ष केल्यास कोरोनाचा टप्पा हा मानवी श्वसन यंत्रणेत अधिक खोलवर जाऊन फुफ्फुसावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.