शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जमावबंदीच्या अंमलबजावणीला नागरिक, प्रशासनाकडून तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:29 IST

जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १४ हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यापैकी १३ हजार ६०० पेक्षा अधिक रुग्ण बरेही झाले ...

जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १४ हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यापैकी १३ हजार ६०० पेक्षा अधिक रुग्ण बरेही झाले आहेत. यामुळे दिलासा मिळून सर्वजण आपापल्या कामांमध्ये व्यस्त झाले होते. कोरोना हद्दपार झाला या अविर्भावात सर्वजण होते, परंतु पंधरा दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली. त्यामुळे चिंताही वाढली.

कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये म्हणून पुन्हा ट्रेसेसिंग तसेच अलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे झाले आहे. मध्यंतरी सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर नव्याने सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. हे सर्व प्रशासन करण्यास तत्पर आहे. परंतु मास्क आणि सॅनिटायझरसह स्वच्छतेकडे पुन्हा दुर्लक्ष होताना दिसत आहे. सर्रासपणे बाजारपेठ तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांवर देखील नागरिक नियम पाळत नसल्याने पुन्हा एकदा झपाट्याने हा कोरोना फैलू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.

वातावरण बदलानेही सर्दीचे रुग्ण वाढले

गेल्या आठवडाभरापासून रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन पडत आहे. त्यातच दोन ते तीन दिवसांपासून थंड वारे आणि अवकाळी पावसाने वातावरणात अचानक बदल झाले आहेत. काही गावांमध्ये गारपीट झाली आहे. या वातावरणातील बदलामुळे देखील अनेक गावांमध्ये लहान-मोठ्यांना सर्दीचा त्रास जाणवत आहे.

सर्दीकडे दुर्लक्ष नको

वातावरणातील बदल तसेच पिण्याच्या पाण्यातील बदलांमुळे देखील सर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे. सर्दी झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले असून, सर्दी तसेच दोन ते तीन दिवस ताप असेल तर लगेचच चाचणी करून घेतल्यास पहिल्याच टप्प्यात असलेला कोरोना लक्षात येऊन त्यावरील उपाय करणे शक्य होतात. दुर्लक्ष केल्यास कोरोनाचा टप्पा हा मानवी श्वसन यंत्रणेत अधिक खोलवर जाऊन फुफ्फुसावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.