शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

तीन तासांचा थरार अन् बिबट्या विहिरीच्या बाहेर; वनविभागाच्या पथकाची मेहनत कामी आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 19:34 IST

वाढोणा शिवारातील घटना : प्रारंभी बाज आतमध्ये सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्या प्रयत्नामध्ये बिबट्या विहिरीच्या बाहेर येऊ शकला नाही.

जालना : विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. तीन तासांच्या थरारक कसरतीनंतर झाडाच्या फांद्यावर चढून तो बिबट्या विहिरीबाहेर पडला. ही घटना शुक्रवारी वाढोणा (ता.भोकरदन) शिवारात घडली.

वाढोणा शिवारातील एका विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती शुक्रवारी सहायक वनसंरक्षक पुष्पा पवार यांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच पवार यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एन. खलसे, वनपाल ए.ए. राठोड, मांटे, पचलोरे, बुरकुले यांच्यासह सर्व वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच औरंगाबादेतील वनविभागाची शीघ्रकृती दलाची टीमही घटनास्थळी धावली. विहीर उथळ आणि पंधरा फूट खोल होती. शिवाय विहिरीतून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा टाकणेही अवघड होते. यामुळे बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या पथकाला मोठी कसरत करावी लागली. विशेषत: प्रारंभी बाज आतमध्ये सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्या प्रयत्नामध्ये बिबट्या विहिरीच्या बाहेर येऊ शकला नाही. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी विहिरीच्या शेजारी असलेले झाड तोडून विहिरीमध्ये आडवे केले. झाड विहिरीमध्ये आडवे करताच तो बिबट्या झाडाच्या फांद्यांवर चढून विहिरीबाहेर आला. विहिरीबाहेर आलेला बिबट्या हा वनक्षेत्राकडे धावून गेला. यावेळी वाढोणा व परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.

पाण्यासाठी भटकंतीसध्या उन्हाचे चटके वाढले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे दिसून येते. हा बिबट्या पाण्याच्या शोधार्थ येऊन विहिरीत पडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वाढोणा शिवारासह अजिंठाच्या डोंगररांगांमधून हा बिबट्या वाढोणा शिवारात आल्याचा अंदाजही वर्तविला जात आहे.

महिनाभरातील दुसरी घटनामहिनाभरापूर्वीच जाफराबाद तालुक्यातील काळेगाव शिवारातील विहिरीत एक बिबट्या पडला होता. या बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या पथकाला कसरत करावी लागली. त्यानंतर आता वाढोणा शिवारात हा बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. वन्य प्राण्यांची भटकंती थांबविण्यासाठी वनक्षेत्रात पाण्याची मुबलक उपलब्धता करणे गरजेचे आहे.

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्याJalanaजालना