शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

शेतकऱ्याने स्वत:ला घेतले गाडून, लालफितीच्या कारभारात बळीराजाचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 08:33 IST

दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळावा, म्हणून अनेकवेळा शासनाकडे पाठपुरावा केला

जालना/मंठा - हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, असं मुख्यमंत्री नेहमीच सांगतात. मात्र, एका शेतकऱ्याला स्वत:च्या हक्कासाठी चक्क जमिनीत गाडून घ्यावं लागलं. हेलस येथील शेतकरी सुनील जाधव यांनी सोमवारी सकाळी स्वत:ला जमिनीत गाडून अनोखे आंदोलन केले. यावेळी शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच, जोपर्यंत शासन जमिनीचा ताबा देत नाही, तोपर्यंत मी येथून उठणार नाही, असेही शेतकरी जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळावा, म्हणून अनेकवेळा शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु, तरीही जमीन मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी अशाप्रकारचे आंदोलन करत प्रशासनाने लक्ष वेधले आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून कौसल्याबाई जाधव व नंदाबाई सदावर्ते यांना गट नं. ४०१ मधील प्रत्येकी १ हेक्टर ३५ आर जमिनी मिळाली होती. या जमिनीचा ताबा मिळावा, यासाठी २०१९ पासून पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठी जाधव यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन दिली. परंतु, अद्यापही जमिनीचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी सुनील जाधव यांनी सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हेलस शिवारात स्वतःला जमिनीत गाडून आंदोलन केले आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा शेतकऱ्याने घेतला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री सांगतात. अधिवेशनातही शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सरकार निर्णय घेत असल्याच्या घोषणा केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती वेगळीच पाहायला मिळले. जालन्यातील एका सर्वसामान्य शेतकऱ्याचं हे दु:ख राज्यातील हजारो नागरिकांचे प्रतिनिधित्व करतेय हेही तितकेच सत्य आहे. 

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीagitationआंदोलनChief Ministerमुख्यमंत्री