शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

शेतकऱ्याने स्वत:ला घेतले गाडून, लालफितीच्या कारभारात बळीराजाचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 08:33 IST

दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळावा, म्हणून अनेकवेळा शासनाकडे पाठपुरावा केला

जालना/मंठा - हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, असं मुख्यमंत्री नेहमीच सांगतात. मात्र, एका शेतकऱ्याला स्वत:च्या हक्कासाठी चक्क जमिनीत गाडून घ्यावं लागलं. हेलस येथील शेतकरी सुनील जाधव यांनी सोमवारी सकाळी स्वत:ला जमिनीत गाडून अनोखे आंदोलन केले. यावेळी शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच, जोपर्यंत शासन जमिनीचा ताबा देत नाही, तोपर्यंत मी येथून उठणार नाही, असेही शेतकरी जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळावा, म्हणून अनेकवेळा शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु, तरीही जमीन मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी अशाप्रकारचे आंदोलन करत प्रशासनाने लक्ष वेधले आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून कौसल्याबाई जाधव व नंदाबाई सदावर्ते यांना गट नं. ४०१ मधील प्रत्येकी १ हेक्टर ३५ आर जमिनी मिळाली होती. या जमिनीचा ताबा मिळावा, यासाठी २०१९ पासून पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठी जाधव यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन दिली. परंतु, अद्यापही जमिनीचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी सुनील जाधव यांनी सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हेलस शिवारात स्वतःला जमिनीत गाडून आंदोलन केले आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा शेतकऱ्याने घेतला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री सांगतात. अधिवेशनातही शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सरकार निर्णय घेत असल्याच्या घोषणा केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती वेगळीच पाहायला मिळले. जालन्यातील एका सर्वसामान्य शेतकऱ्याचं हे दु:ख राज्यातील हजारो नागरिकांचे प्रतिनिधित्व करतेय हेही तितकेच सत्य आहे. 

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीagitationआंदोलनChief Ministerमुख्यमंत्री