शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शेतकऱ्याने स्वत:ला घेतले गाडून, लालफितीच्या कारभारात बळीराजाचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 08:33 IST

दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळावा, म्हणून अनेकवेळा शासनाकडे पाठपुरावा केला

जालना/मंठा - हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, असं मुख्यमंत्री नेहमीच सांगतात. मात्र, एका शेतकऱ्याला स्वत:च्या हक्कासाठी चक्क जमिनीत गाडून घ्यावं लागलं. हेलस येथील शेतकरी सुनील जाधव यांनी सोमवारी सकाळी स्वत:ला जमिनीत गाडून अनोखे आंदोलन केले. यावेळी शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच, जोपर्यंत शासन जमिनीचा ताबा देत नाही, तोपर्यंत मी येथून उठणार नाही, असेही शेतकरी जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळावा, म्हणून अनेकवेळा शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु, तरीही जमीन मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी अशाप्रकारचे आंदोलन करत प्रशासनाने लक्ष वेधले आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून कौसल्याबाई जाधव व नंदाबाई सदावर्ते यांना गट नं. ४०१ मधील प्रत्येकी १ हेक्टर ३५ आर जमिनी मिळाली होती. या जमिनीचा ताबा मिळावा, यासाठी २०१९ पासून पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठी जाधव यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन दिली. परंतु, अद्यापही जमिनीचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी सुनील जाधव यांनी सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हेलस शिवारात स्वतःला जमिनीत गाडून आंदोलन केले आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा शेतकऱ्याने घेतला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री सांगतात. अधिवेशनातही शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सरकार निर्णय घेत असल्याच्या घोषणा केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती वेगळीच पाहायला मिळले. जालन्यातील एका सर्वसामान्य शेतकऱ्याचं हे दु:ख राज्यातील हजारो नागरिकांचे प्रतिनिधित्व करतेय हेही तितकेच सत्य आहे. 

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीagitationआंदोलनChief Ministerमुख्यमंत्री