शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

शेतकऱ्याने स्वत:ला घेतले गाडून, लालफितीच्या कारभारात बळीराजाचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 08:33 IST

दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळावा, म्हणून अनेकवेळा शासनाकडे पाठपुरावा केला

जालना/मंठा - हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, असं मुख्यमंत्री नेहमीच सांगतात. मात्र, एका शेतकऱ्याला स्वत:च्या हक्कासाठी चक्क जमिनीत गाडून घ्यावं लागलं. हेलस येथील शेतकरी सुनील जाधव यांनी सोमवारी सकाळी स्वत:ला जमिनीत गाडून अनोखे आंदोलन केले. यावेळी शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच, जोपर्यंत शासन जमिनीचा ताबा देत नाही, तोपर्यंत मी येथून उठणार नाही, असेही शेतकरी जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळावा, म्हणून अनेकवेळा शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु, तरीही जमीन मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी अशाप्रकारचे आंदोलन करत प्रशासनाने लक्ष वेधले आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून कौसल्याबाई जाधव व नंदाबाई सदावर्ते यांना गट नं. ४०१ मधील प्रत्येकी १ हेक्टर ३५ आर जमिनी मिळाली होती. या जमिनीचा ताबा मिळावा, यासाठी २०१९ पासून पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठी जाधव यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन दिली. परंतु, अद्यापही जमिनीचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी सुनील जाधव यांनी सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हेलस शिवारात स्वतःला जमिनीत गाडून आंदोलन केले आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा शेतकऱ्याने घेतला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री सांगतात. अधिवेशनातही शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सरकार निर्णय घेत असल्याच्या घोषणा केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती वेगळीच पाहायला मिळले. जालन्यातील एका सर्वसामान्य शेतकऱ्याचं हे दु:ख राज्यातील हजारो नागरिकांचे प्रतिनिधित्व करतेय हेही तितकेच सत्य आहे. 

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीagitationआंदोलनChief Ministerमुख्यमंत्री