शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

हिरव्या मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:44 AM

भोकरदन तालुक्यातील हिरव्या मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वालसावंगी येथील बाजारपेठेत हिरव्या मिरचीला केवळ १५ रुपये भाव मिळाला.यात खर्चच अधिक झाल्याने शेतक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन तालुक्यातील हिरव्या मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वालसावंगी येथीलबाजारपेठेत हिरव्या मिरचीला केवळ १५ रुपये भाव मिळाला.यात खर्चच अधिक झाल्याने शेतक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.येथील बाजारपेठेपेक्षा दुस-या बाजारपेठेत अधिक भाव मिळत असल्याने व्यापारी मुद्दाम कमी भावात मिरची खरेदी करत असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला. येथिल बाजारपेठेत दररोज ४ वाजता लिलाव पद्धतीने हराशी होते. परंतु लिलाव प्रत्येक गाड़ीचा न करता एकाच गाड़ीचा होतो व तो लिलावावर सर्वात जास्त बोली लागते.यामुळे सर्व शेतक-यांना समान भाव मिळत नसल्याचे शेतक-यांनी सांगितले. लिलाव प्रत्येक मिरची पोत्याचा झाला पाहिजे अशी शेक-यांची मागणी आहे. मिरचिचा लिलाव हा धावड़ा - वालसावंगी या मुख्य मार्गावर होत असल्याने वाहतूकीवर त्याचा परिणाम होत असल्याने हा लिलाव दुसरीकडे घ्यावा अशी वाहनधारकांची मागणी आहे.यंदा परिसरातील शेतक-यांनी मिरची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळेले अशी अपेक्षा होती. मात्र, उत्पन्न तर सोडाच परंतू लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतक-यांच्या डोळ्यात आज तरी मिरचिने पाणी आणले आहे. लिलाव होतानाचा भाव हा सर्व शेतक-यांना समान मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच भाव कधी वाढेल याकडे शेतक-यांचे लक्ष लागून आहे.उत्पादन खर्च अधिक होत आहे भाव कमी असल्याने परवडत नसल्याचे शेतकरी सांगतात. लिलाव पद्धतीत वेगळा भाव करतात व प्रत्यक्ष हातात कमी भाव देतात. असा भेदभाव न करता सरसकट शेतक-यांना जो भाव मिळाला तोच भाव सर्वांना द्यावा अशी मागणी येथील शेतकरी भानुदास खड़के, भगवान वाघ, राजू कोथळकर, नारायण गवळी, यांच्यासह इतर शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी