शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

उद्दिष्ट ३२ हजारांचे, लाभ मात्र ९ हजार जणांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:32 AM

माता व बालकांच्या मृत्यू दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येत आहे.

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माता व बालकांच्या मृत्यू दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याला २०१७-१८ या दोन वर्षांत ३२ हजार ६५९ लाभार्थ्यांचे उद्द्ष्टि होते. परंतु, त्यापैकी फक्त ९ हजार ८६८ लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळाला.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या स्थितीत ज्या महिला गर्भवती आहेत, त्यापैकी ५३ टक्के महिला पहिल्यांदाच गर्भवती झाल्या आहेत. या सर्व महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या पोर्टलनुसार, जिल्ह्याला जानेवारी २०१७ ते दिसेंबर २०१८ अखेरपर्यंत ३२ हजार ६५९ महिलांना या योजनेचा लाभ द्याचा होता. परंतु, ९ हजार ८६८ महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला.टप्प्याने मिळतो लाभगर्भवती महिलेने गर्भावस्थेत स्वत: ची काळजी घ्यावी, पौष्टिक आहार मिळावा या उद्देशातून टप्याटप्याने लाभ देण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती, अनूसूचित जमाती, बीपीएल अशी अट ठेवण्यात आली आहे. पहिल्या बाळाच्या वेळी नोकरपेशातील, अंगणवाडी सेविका, सहायिका, आशा यांना लाभ देण्यात येतो. लाभार्थ्यांच्या बँक, डाक खात्यात हा लाभ जमा केला जातो.यासाठी लाभार्थ्यांचा खाते क्रमांक व आधार क्रमांक आवश्यक आहे. गर्भवतीच्या नोंदणीच्यावेळी १ हजार रुपये तर सहा महिने पूर्ण झाल्यावर २ हजार रुपये देण्यात येते. प्रसूतीनंतर बाळाची जन्म नोंदणी व पेंटावैलेट-३ दिल्यानंतर १४ आठवडे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये देण्यात येते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाHealthआरोग्य