शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतीचे उत्पादन वाढीसाठी सुपर-२० कार्यक्रम; पेरणीपासून ते काढणीपर्यंत कृषी विभागाचे मार्गदर्शन

By महेश गायकवाड  | Updated: May 20, 2023 19:44 IST

शेती मशागत कामाला हात भार लावण्याकरिता कृषी विभागाने मागील दोन वर्षांत यांत्रिकीकरणावर भर दिला आहे.

जालना: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी विभागाने २० कलमी कार्यक्रम आखला आहे. त्याची अंमलबजावणी यशस्वीरित्या करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहे. शेतकऱ्यांची खते, बि-बियाणे व किटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी कृषी सेवा केंद्रावर कडक नजर राहण्याबरोबरच शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणी पासून ते काढणीपर्यंत पीकनिहाय उत्पादनवाढीच्या सूत्राचे मार्गदर्शन कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी करणार आहेत.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळे त्याचे योग्य नियोजन झाले तरच उत्पादनात वाढ होणार आहे. तालुक्यात सोयाबीनसह कपाशीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि इतर पिकांच्या पेऱ्यात उशीर झाला तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही. यावर्षी कापसाला अपेक्षित भाव मिळाला नाही. तरीसुद्धा कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. त्याचबरोबर कमी कालावधीत अधिकच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोयाबिनचा पेराही वाढणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

काय आहे सुपर-२० कार्यक्रमजालना जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी सर्व तालुक्यास खरीप हंगामाच्या नियोजनासाठी २० कलमी आराखडा आखून दिला आहे. यात प्रामुख्याने बीज उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, कृषी सेवा केंद्रनिहाय कृषी कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती करणे, जमिनीच्या सुपीकता निर्देशांकानुसार खत व्यवस्थापन, पीकनिहाय उत्पादनवाढीची सूत्रे या बाबींचा समावेश आहे. यांत्रिकीकरणावर भर देणारशेती मशागत कामाला हात भार लावण्याकरिता कृषी विभागाने मागील दोन वर्षांत यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. एकट्या जाफराबाद तालुक्यात  ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारासाठी ३६४ लाभार्थींना २ कोटी ६४ लाख, सिंचनासाठी (ठिबक व तुषार संच वगळता) २११९ लाभार्थींना ४ कोटी ३६ लाख, फलोत्पादन घटकासाठी २३१ लाभार्थींना १ कोटी ९२ लाख असे एकूण ८ कोटी ९२ कोटींचा निधी वितरित केला आहे.- संतोष गायकवाड, तालुका कृषी अधिकारी.

टॅग्स :JalanaजालनाagricultureशेतीFarmerशेतकरी