शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

उन्हाळा संपत आलाय.. टंँकर मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 1:00 AM

जालना तालुक्यातील खरपुडी या गावात अद्याप टँकर सुरु करण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

दीपक ढोले / विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गतवर्षी पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. अशी परिस्थिती असतानाही जालना तालुक्यातील खरपुडी या गावात अद्याप टँकर सुरु करण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.जालना शहरापासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर खरपुडी हे गाव आहे. या गावात कृषी विज्ञान केंद्र आहेत. गावाची लोकसंख्या ५ हजार ८०० आहे. तर जनावरांची संख्या ९०० आहे. गतवर्षी पाऊस न पडल्याने गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडीठाक पडली आहे.या गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. गावातील पाण्याची व्यवस्था बिकट आहे. उन्हाळा संपत आला आहे. परंतु, अद्यापही गावात टँकर सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील शेतकरी कापूस, बाजरी, तूर, ऊस, ज्वारी, हरभरा ही मुख्य पिके घेतात. काही प्रमाणात मोसंबी, डाळिंब या फळबागांचेही क्षेत्र आहे. पाण्याअभावी त्याचेही सरपण होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी टँकरचे पाणी विकत घेऊन फळबागा जगवित आहे. परंतु, पाणी कमी असल्याने अडचणीत भर पडली आहे.पाण्याची व्यवस्था नाहीच : जनावरांच्या चा-याचा प्रश्नगावात पशु-पक्ष्यांची संख्या जवळपास ९०० आहे. नागरिकांना प्रशासनाच्या वतीने टँकर सुरु करण्यात आले नाही तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न दूरच. त्यामुळे जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात चारा उपलब्ध नाही. बाहेरुन जास्तीचे पैसे खर्च करुन चारा विकत घ्यावा लागत आहे.पशुपालकांना जनावरांचे पालन पोषण करणे अवघड झाले आहे. त्यामुळे काही पशुपालक आपली जनावरे मिळेल त्या भावात विकून मोकळे होत आहेत. गावाच्या परिसरात शेळ््या चारणा-या एका महिलेने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, मागील दोन महिन्यांपासून शेळ््या भर उन्हात चाराव्या लागत आहेत. त्यातच कुठे पाणी मिळते तर कुठे मिळत नाही.मोफत टँकरने पाणीपुरवठागावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने येथील अरुण गिरी हे मोफत टँकरने पाणी पुरवठा करीत आहे.टँकर आले की, ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी गर्दी करतात. शासकीय टँकर सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.चारा छावणीची गरजया गावात ९०० जनावरांची संख्या आहेत. यात गायी, म्हशी, शेळ््या, मेंढ्या इ. जनावरांचा समावेश आहे. सध्या गावात चारा उपलब्ध नाही. त्यातच माणसांनाच पाणी मिळत नसल्याने जनावरांना पाणी कुठून आणायचे, अशा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावात चारा छावणी सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई