राणीउंचेगाव (जालना ) : दुष्काळ व सततच्या नापिकीला कटांळून घनसावंगी तालुक्यातील शिंदी वडगाव येथील ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.
विलास आसाराम चव्हाण (३२) असे शेतकऱ्याचे नाव आहे. चव्हाण हे सततची नापिकी व महाराष्ट्र बँकेचे असलेले कर्ज परतफेड करू शकत नसल्याने नैराश्यात होते. यामुळे कंटाळून पानेवाडी शिवारामधील गट क्रमांक ३२० मधील स्वत:च्या शेतात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे.