शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

उसाअभावी गळीत हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 1:02 AM

यंदाचा गळीत हंगाम धोक्यात आल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या मानाने उसाचे क्षेत्र अत्यल्प आहे. त्यातच गोदावरीचा पट्टा सोडल्यास अन्य तालुक्यांत ऊस नावालाच दिसतो. परंतु यंदा तर गोदावरी पट्ट्यातही उसाचे क्षेत्र घटले असून, यंदा समर्थ आणि सागर कारखान्यांना पुरेल एवढाच ऊस शिल्लक असल्याचे दिसून आले. या दोन कारखान्यांनी गेल्या वर्षी एक लाख ६७ हजार मेट्रिक टन ऊस स्वत:च्या पैशाने अन्य कारखान्यांना दिला होता. ती परिस्थिती यंदा राहिली नसल्याने यंदाचा गळीत हंगाम धोक्यात आल्याचे वास्तव आहे.जालना जिल्ह्यात तीन सहकारी आणि दोन खाजगी साखर कारखाने आहेत. यंदा समर्थ आणि सागर अशा दोन कारखाना क्षेत्रात केवळ १५ हजार ७०० हेक्टरवर ऊस आहे. गेल्या दोन वर्षात या भागातील उसाचे उत्पादन घटले आहे. यंदा तर हे उत्पादन थेट २० टक्क्यांनी घटले आहे. गेल्यावर्षी या दोन्ही कारखान्यांनी मिळून ११ लाख ३७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. त्यावेळी साखरेचा उतारा हा ११.६० टक्के एवढा होता.यंदा या दोन्ही कारखान्यांनाच ऊस कमी पडणार असल्याने जिल्ह्यातील बागेश्वरी, समृध्दी या दोन खाजगी कारखान्यांसह भोकरदन येथील रामेश्वर साखर कारखान्यांना उसाचा प्रचंड तुटवडा जाणवणार आहे. त्यातच या तिन्ही कारखान्यांना बाहेरून ऊस आणायचा म्हटले तरी तो जवळपास शिल्लक नाही. पैठणसह अन्य काही तालुक्यात ऊस आहे, परंतु त्या भागात पश्चिम महाराष्ट्रातील बडे साखर कारखाने हे शेतकऱ्यांना जास्तीचा दर देऊन ऊस घेऊन जातात.गेल्या वर्षी देखील कमी पावसा मुळे हवा तेवढा ऊस शेतकऱ्यांना लावता आला नाही, तसेच मध्यंतरी प्रचंड चारा टंचाईने हैराण असलेल्या पशुपालकांना अनेक ऊस उत्पादक शेतक-यांनी त्यांच्या उसाचा चारा जास्त किमतीने पुरवल्याने देखील ऊस उत्पादन घटले आहे. जालना जिल्ह्यात जून ते आॅगस्ट या दरम्यान आडसाली उसाची लागवड ही देखील यंदा उशिराने झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी हे व्हीएसआय ८००७, को- ९६०३२, को-सी- ६७१ यसा जतीचा ऊस लावतात.समर्थ, सागर पूर्ण उसाचे गाळप करणारयंदा उसाचे उत्पादन कमी होणार, ही बाब निश्चित आहे. आमच्या कारखाना क्षेत्रातही आम्हाला हवा तेवढा ऊस यंदा उपलब्ध होणार नसल्याचे चित्र आहे. परंतु अशाही स्थितीत आम्ही आहे त्या उसातून जास्तीत जास्त गाळप करण्याचा प्रयत्न करू. लवकरच आमचे बॉयलर प्रदीपन कार्यक्रम होणार असून, शेतक-यांचे हित हेच आमचे हित राहणार आहे. त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन कमी निघणार असले तरी आम्ही संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे नियोजन करणार आहोत. - आ. राजेश टोपे, संचालक समर्थ साखर कारखाना, अंकुशनगर

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेRajesh Topeराजेश टोपेdroughtदुष्काळ