शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:03 AM

अंबड तालुक्यातील ६५ गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या विरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडीगोद्री येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील ६५ गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या विरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडीगोद्री येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.तालुक्यातील अनेक गावामधील नागरिकांनी वीज बिल भरणा केलेला आहे. तसेच नागरिक नियमितपणे बिले भरत आहेत. त्या लोकांवर एक प्रकारे महावितरण कंपनीकडून अन्याय केला जात आहे. तालुक्यात शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना महावितरण कंपनीने कुठलीही पूर्व सूचना न देता २५ गावाचा विद्युत पुरवठा खंडित केला.तसेच ४० गावाचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने काढल्याने शेतक-यांत संताप व्यक्त होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना महावितरण कंपनी जुलमी पद्धतीने वागत असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यानी केला.अनेक शेतकरी कर्जर् बाजारीपणामुळे आत्महत्या करत असताना महावितरण कंपनीने शेतक-यांना वेठीस धरले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनामध्ये भाजपा सरकारबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.महावितरणकडे नागरिकांनी मीटर मिळण्याकरिता कोटेशन, नवीन मीटरची मागणी केली. परंतु त्या नागरिकांना पैसे भरूनही परवाना व मीटर देण्यात येत नाही. मागील पंधरवड्यात वादळ वा-याने पडलेले विद्युत खांब आजपर्यंत महावितरणकडून उभे करण्यात आले नाही.जमीनदोस्त झालेले खांब जशास तसे पहायला मिळत आहे. खांब पडून झालेले नुकसान व निर्माण झालेली वीज समस्या दूर करण्यासाठी कुठलीही योजना नाही. ग्राहकांना देण्यासाठी महावितरणकडे केबल, मीटर देखील नाहीत. महावितरणचे कर्मचारी हे रीडिंग घेण्यासाठी घरोघरी न जाता कुठेतरी एकाच ठिकाणी बसून अंदाजे रीडिंग टाकून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा पद्धतीने वीजबिल आकारले जाते. अशा एक ना अनेक समस्या असताना त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार चालू आहे.तसेच महावितरण कंपनीने आपला मनमानी पणा थांबवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे, जिल्हा बँकेचे चेअरमन मनोज मरकड, जि.प.सदस्य विष्णूपंत गायकवाड, संजय पटेकर, भाऊसाहेब कनके, सदाशिव दुफाके, बापूराव खटके, किरण तारख, विकास कव्हळे, भागुजी मैंद, बाबासाहेब बोंबले, अशोक मांगदरे, राजन उढाण, सहदेव भारती, बाबासाहेब मस्के, सलीम शेख, बाबासाहेब गावडे,नारायण वायाळ, आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेस