शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

तब्येत सांभाळा; पाऊस थांबला, उन्हाचा चटकादेखील वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST

जालना : गत आठ-दहा दिवस दिवस जिल्ह्यात बरसणारा पाऊस गायब झाला असून, उन्हाची तीव्रता वाढली आहे. वातावरणात अचानक झालेल्या ...

जालना : गत आठ-दहा दिवस दिवस जिल्ह्यात बरसणारा पाऊस गायब झाला असून, उन्हाची तीव्रता वाढली आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला, तापीचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे खासगी, शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.

यंदा वेळेवर आलेला पाऊस मध्यंतरी गायब झाला होता. मोठ्या खंडानंतर जिल्ह्यात पाऊस दाखल झाला. आठ-दहा दिवस झालेला हा पाऊस कोठे मध्यम स्वरूपाचा, तर कुठे रिमझिम पाऊस झाला. त्यात आता पुन्हा कडक ऊन पडू लागले आहे. अचानक वातावरणात बदल होऊ लागल्याने विविध आजार फैलावू लागले आहेत. याचा सर्वाधिक त्रास लहान बालकांसह वयोवृद्धांना होत असल्याचे चित्र रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण संख्येवरून दिसत आहे.

वातावरण बदलले; काळजी घ्या...

मागील काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. बदलत्या वातावरणात दैनंदिन खाद्यपदार्थांवर लक्ष द्यावे.

पिण्याचे पाणी शक्यतो उकळून प्यावे किंवा पाणी निर्जंतुकीकरण करून प्यावे.

बाहेरील खाद्यपदार्थ, शीतपेये घेणे टाळावे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.

सर्दी, खोकला, ताप यासह इतर आजार असतील तर ते अंगावर न काढता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार घ्यावेत.

पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

जिल्ह्यात यंदा वेळेवर पावसाला सुरुवात झाली होती.

जुलैअखेर आणि ऑगस्ट महिन्याच्या मध्यंतरी पावसाने मोठी दडी मारली होती.

पावसाने अचानक दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती.

यंदा पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, १०३ टक्के पाऊस झाला आहे.