शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

तब्येत सांभाळा; पाऊस थांबला, उन्हाचा चटकादेखील वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST

जालना : गत आठ-दहा दिवस दिवस जिल्ह्यात बरसणारा पाऊस गायब झाला असून, उन्हाची तीव्रता वाढली आहे. वातावरणात अचानक झालेल्या ...

जालना : गत आठ-दहा दिवस दिवस जिल्ह्यात बरसणारा पाऊस गायब झाला असून, उन्हाची तीव्रता वाढली आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला, तापीचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे खासगी, शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.

यंदा वेळेवर आलेला पाऊस मध्यंतरी गायब झाला होता. मोठ्या खंडानंतर जिल्ह्यात पाऊस दाखल झाला. आठ-दहा दिवस झालेला हा पाऊस कोठे मध्यम स्वरूपाचा, तर कुठे रिमझिम पाऊस झाला. त्यात आता पुन्हा कडक ऊन पडू लागले आहे. अचानक वातावरणात बदल होऊ लागल्याने विविध आजार फैलावू लागले आहेत. याचा सर्वाधिक त्रास लहान बालकांसह वयोवृद्धांना होत असल्याचे चित्र रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण संख्येवरून दिसत आहे.

वातावरण बदलले; काळजी घ्या...

मागील काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. बदलत्या वातावरणात दैनंदिन खाद्यपदार्थांवर लक्ष द्यावे.

पिण्याचे पाणी शक्यतो उकळून प्यावे किंवा पाणी निर्जंतुकीकरण करून प्यावे.

बाहेरील खाद्यपदार्थ, शीतपेये घेणे टाळावे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.

सर्दी, खोकला, ताप यासह इतर आजार असतील तर ते अंगावर न काढता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार घ्यावेत.

पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

जिल्ह्यात यंदा वेळेवर पावसाला सुरुवात झाली होती.

जुलैअखेर आणि ऑगस्ट महिन्याच्या मध्यंतरी पावसाने मोठी दडी मारली होती.

पावसाने अचानक दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती.

यंदा पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, १०३ टक्के पाऊस झाला आहे.