शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

जालना जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्पांची तहान कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:15 IST

भोकरदन तालुका वगळता इतरत्र दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४१ प्रकल्प आजही कोरडेठाक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळ्याचा एक महिना लोटत आला आहे. मात्र, भोकरदन तालुका वगळता इतरत्र दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४१ प्रकल्प आजही कोरडेठाक आहेत. तर २० प्रकल्पांमध्ये मृतपाणीसाठा आहे. पावसाअभावी प्रकल्पांची तहान अन् गावा-गावातील पाणीटंचाई कायम आहे.गतवर्षी अपुऱ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागला. पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून टँकरसह अधिग्रहणावर लाखो रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. यंदा जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. मात्र, भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांची तहानही कायम आहे. जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांपैकी एक मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. तर चार प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे. केवळ दोन प्रकल्पांमध्ये ७६ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. यात भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात सद्यस्थितीत ५.१८ दलघमी म्हणजे ८५.९५ टक्के पाणी उपलब्ध आहे. गत आठवड्यात या प्रकल्पात केवळ १.२२ दलघमी पाणी उपलब्ध होते. तर धामणा प्रकल्पात ८.५१ दलघमी म्हणजे ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर जिल्ह्यात ६४ लघू प्रकल्प आहेत. पैकी ४१ प्रकल्प पूर्णत: कोरडेठाक पडले आहेत. २० प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. एका प्रकल्पात ० ते २५ दलघमी पाणी उपलब्ध आहे. पावसाअभावी प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. परिणामी प्रकल्पांवर आधारित असलेल्या शेकडो गावांसह शहरी भागातील पाणी प्रश्न कायम आहे.५ टक्के उपयुक्त पाणीसाठा : केवळ १५ टक्के पाऊसजिल्ह्यातील सात पैकी केवळ दोन मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पात एकूण १८.७४ टक्के पाणी उपलब्ध आहे. तर लघू प्रकल्पात ०.०४ टक्के पाणी असून, जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण ५.४३ टक्के उपयुक्त पाणी उपलब्ध आहे.गतवर्षी याच कालावधीत प्रकल्पांमध्ये केवळ ७.७८ दलघमी म्हणजे ३.२७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १२.९० दलघमी म्हणजे ५.४३ टक्के पाणीसाठा झाला असून, गतवर्षीपेक्षा २.१६ .टक्यांनी साठा वाढला आहे.भोकरदन तालुक्यात पाणीच पाणीभोकरदन तालुक्यात आजवर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिणामी जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी केवळ भोकरदन तालुक्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेच्या ७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. इतर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये अद्यापही ठणठणाट आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीriverनदीdroughtदुष्काळDamधरण