शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

जालना जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्पांची तहान कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:15 IST

भोकरदन तालुका वगळता इतरत्र दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४१ प्रकल्प आजही कोरडेठाक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळ्याचा एक महिना लोटत आला आहे. मात्र, भोकरदन तालुका वगळता इतरत्र दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४१ प्रकल्प आजही कोरडेठाक आहेत. तर २० प्रकल्पांमध्ये मृतपाणीसाठा आहे. पावसाअभावी प्रकल्पांची तहान अन् गावा-गावातील पाणीटंचाई कायम आहे.गतवर्षी अपुऱ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागला. पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून टँकरसह अधिग्रहणावर लाखो रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. यंदा जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. मात्र, भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांची तहानही कायम आहे. जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांपैकी एक मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. तर चार प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे. केवळ दोन प्रकल्पांमध्ये ७६ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. यात भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात सद्यस्थितीत ५.१८ दलघमी म्हणजे ८५.९५ टक्के पाणी उपलब्ध आहे. गत आठवड्यात या प्रकल्पात केवळ १.२२ दलघमी पाणी उपलब्ध होते. तर धामणा प्रकल्पात ८.५१ दलघमी म्हणजे ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर जिल्ह्यात ६४ लघू प्रकल्प आहेत. पैकी ४१ प्रकल्प पूर्णत: कोरडेठाक पडले आहेत. २० प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. एका प्रकल्पात ० ते २५ दलघमी पाणी उपलब्ध आहे. पावसाअभावी प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. परिणामी प्रकल्पांवर आधारित असलेल्या शेकडो गावांसह शहरी भागातील पाणी प्रश्न कायम आहे.५ टक्के उपयुक्त पाणीसाठा : केवळ १५ टक्के पाऊसजिल्ह्यातील सात पैकी केवळ दोन मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पात एकूण १८.७४ टक्के पाणी उपलब्ध आहे. तर लघू प्रकल्पात ०.०४ टक्के पाणी असून, जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण ५.४३ टक्के उपयुक्त पाणी उपलब्ध आहे.गतवर्षी याच कालावधीत प्रकल्पांमध्ये केवळ ७.७८ दलघमी म्हणजे ३.२७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १२.९० दलघमी म्हणजे ५.४३ टक्के पाणीसाठा झाला असून, गतवर्षीपेक्षा २.१६ .टक्यांनी साठा वाढला आहे.भोकरदन तालुक्यात पाणीच पाणीभोकरदन तालुक्यात आजवर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिणामी जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी केवळ भोकरदन तालुक्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेच्या ७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. इतर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये अद्यापही ठणठणाट आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीriverनदीdroughtदुष्काळDamधरण