शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जालना जिल्हा कारागृहाचा मार्ग खडतर, पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 1:20 AM

राज्य शासनाने तब्बल २१ कोटी ४२ लाख रुपये खर्च करुन इंदेवाडी परिसरात सुसज्य जिल्हा कारागृहाची उभारणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाने तब्बल २१ कोटी ४२ लाख रुपये खर्च करुन इंदेवाडी परिसरात सुसज्य जिल्हा कारागृहाची उभारणी केली आहे. मात्र कारागृहाकडे जाण्यासाठी पक्का रस्ताच नसल्याने पोलीस कर्मचा-यांची गैरसोय होत आहे. गेल्या सहा वर्षापासून शासनाकडे रस्त्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.अंबड मार्गावर असलेल्या इंदेवाडी परिसरातील ७५ एकर जागेवर जिल्हा कारागृहाची उभारणी करण्यात आली आहे. १ डिसेंबर २९१४ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी ए. एस.आर नायक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. सध्या स्थितीत कारागृहात ६०० कैदी ठेवण्याची क्षमता आहे. कारागृहात प्रशासकीय इमारत, जनरल बरॅक, कीचन बरॅक, दवाखाना, कार्यशाळा इमारत, तब्बल ७५ पोलीस कर्मचा-यांचे निवासस्थाने , अतिसुरक्षा भिंत प्रतीक्षा कक्ष बाहेरील आवार आदी उभारण्यात आले आहेत. मात्र कारागृहाकडे जाणारा मार्ग अद्यापही पक्का झाला नसल्याने पोलिसांना कारागृहापर्यंत कैद्यांना नेताना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे.पावसाच्या दिवसात तर दोन किमी चिखल तुडवत धोकादायक रीत्या कैद्यांना न्यावे लागते. यात कैदी पळून जाण्याची भीती असल्याचे अनेकदा पोलिसांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सलग सहा वर्षापासून जिल्हा नियोजन समितीसमोर कारागृहाच्या रस्त्याचा विषय मांडण्यात येत आहे. मात्र याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. येथील पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीय, कैद्याना भेटण्यास येणाºया नातेवाईकांना सुध्दा रस्त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले.राज्यातील जुन्या कारागृहाची डागडुजी, संरक्षण भिंत, बराकीची सुरक्षिता इ. देखभाल दुरुस्तीसाठी राज्य शासनाने सोमवारी ९ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे जाहीर केले. असे असताना जालना येथील जिल्हा कारागृहाचा रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर होण्यास अडचणी येत आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :jailतुरुंगroad transportरस्ते वाहतूकPoliceपोलिस