शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

ग्राहकां अभावी जालना मोंढ्यातील उलाढालीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:22 IST

बाजारगप्पा : दुष्काळी छायेमुळे बाजारपेठेत जेमतेम ग्राहकी असल्याचे दिसून येते.

- संजय देशमुख (जालना )

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मका आणि नवीन तुरीची आवक बऱ्यापैकी आहे. असे असले तरी बाजारातील चैतन्य लोप पावले आहे. कुक्कुटपालन व्यवसाय आणि स्टार्च उद्योगासाठी लागणारा मका जवळपास ३ हजार पोती बाजारात येत आहे. साखरेला मागणी असली तरी साखरेचे भाव स्थिर आहेत.

मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मात्र, दुष्काळी छायेमुळे बाजारपेठेत जेमतेम ग्राहकी असल्याचे दिसून येते. अनेक व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले सोयाबीन, तूर तसेच मका मोंढ्यातील रस्त्यांवर वाळत घातली असून, चाळणीद्वारे त्यातील काडी- कचरा साफ करण्याचे काम सुरू आहे. साखरेचा कोटा संबंधित कारखान्यांना विक्रीसाठी शासनाने ठरवून दिला होता. तो कोटा विक्री झाला आहे. कोटा विक्री होत असल्याने साखरेला मागणी मोठ्या प्रमाणावर असली तरी आजही साखर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ३ हजार २०० च्या पुढे सरकण्यास तयार नाही. आता केंद्र सरकार नवीन कोटा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करणार असल्याने त्याकडे साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांचे डोळे लागून आहेत. 

दरम्यान, कुठल्याच मालाला तेजी नसल्याने पूर्वीप्रमाणे व्यापारी हे जेवढा माल लागतो तेवढाच खरेदी करीत आहेत. साठवणूक करून तो दडवून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या फंदात आता धान्याचे दलालदेखील पुढे येत नसल्याचे सांगण्यात आले. जालना बाजारपेठेत मोसंबीची आवकही नगण्य झाली आहे.  गेल्या आठवड्यात जिल्ह्यात धुके पडल्याने द्राक्ष बागांवरही त्याचा परिणाम झाला आहे. मका, सोयाबीन, तुरीची आवक बऱ्यापैकी आहे. तुरीचे भाव हे ४५००  ते ४७०० रुपये क्विंटल आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे मालाची खरेदी करण्यासाठी नाफेडने सहा खरेदी केंद्रे सुरू केली होती. मात्र त्या केंद्रांवरील खरेदी आता शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने रविवारपासून ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदी केंद्रावर २० डिसेंबरपर्यंत केवळ १ हजार ५५५ क्विंटल उडीद, मूग आणि सोयाबीनची आवक झाली होती. कमी पावसाचा फटका मूग, उडीद आणि सोयाबीनलाही बसल्याने ही आवक कमी झाली आहे. दी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात जालना, भोकरदन, अंबड, बदनापूर, तीर्थपुरी आणि परतूर ही सहा खरेदी केंदे्र सुरू केली होती. त्यात उडदासाठी ३८३, मूग १ हजार १०७, सोयाबीन ७४८, अशी एकूण २ हजार २१९ क्विंटलची नोंदणी करण्यात आली होती. खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर १३८ शेतकऱ्यांनी उडीद ४४८, मूग ८८६ क्विंटल अशी एकूण ६०८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

नवीन गुळाची आवक जालना बाजारपेठेत बऱ्यापैकी असून, तीन ते साडेतीन हजार गुळाच्या भेली येत आहेत. आता फेडरेशनकडून तूर खरेदीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, अद्याप त्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी गजानन मगरे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी