शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

ग्राहकां अभावी जालना मोंढ्यातील उलाढालीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:22 IST

बाजारगप्पा : दुष्काळी छायेमुळे बाजारपेठेत जेमतेम ग्राहकी असल्याचे दिसून येते.

- संजय देशमुख (जालना )

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मका आणि नवीन तुरीची आवक बऱ्यापैकी आहे. असे असले तरी बाजारातील चैतन्य लोप पावले आहे. कुक्कुटपालन व्यवसाय आणि स्टार्च उद्योगासाठी लागणारा मका जवळपास ३ हजार पोती बाजारात येत आहे. साखरेला मागणी असली तरी साखरेचे भाव स्थिर आहेत.

मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मात्र, दुष्काळी छायेमुळे बाजारपेठेत जेमतेम ग्राहकी असल्याचे दिसून येते. अनेक व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले सोयाबीन, तूर तसेच मका मोंढ्यातील रस्त्यांवर वाळत घातली असून, चाळणीद्वारे त्यातील काडी- कचरा साफ करण्याचे काम सुरू आहे. साखरेचा कोटा संबंधित कारखान्यांना विक्रीसाठी शासनाने ठरवून दिला होता. तो कोटा विक्री झाला आहे. कोटा विक्री होत असल्याने साखरेला मागणी मोठ्या प्रमाणावर असली तरी आजही साखर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ३ हजार २०० च्या पुढे सरकण्यास तयार नाही. आता केंद्र सरकार नवीन कोटा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करणार असल्याने त्याकडे साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांचे डोळे लागून आहेत. 

दरम्यान, कुठल्याच मालाला तेजी नसल्याने पूर्वीप्रमाणे व्यापारी हे जेवढा माल लागतो तेवढाच खरेदी करीत आहेत. साठवणूक करून तो दडवून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या फंदात आता धान्याचे दलालदेखील पुढे येत नसल्याचे सांगण्यात आले. जालना बाजारपेठेत मोसंबीची आवकही नगण्य झाली आहे.  गेल्या आठवड्यात जिल्ह्यात धुके पडल्याने द्राक्ष बागांवरही त्याचा परिणाम झाला आहे. मका, सोयाबीन, तुरीची आवक बऱ्यापैकी आहे. तुरीचे भाव हे ४५००  ते ४७०० रुपये क्विंटल आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे मालाची खरेदी करण्यासाठी नाफेडने सहा खरेदी केंद्रे सुरू केली होती. मात्र त्या केंद्रांवरील खरेदी आता शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने रविवारपासून ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदी केंद्रावर २० डिसेंबरपर्यंत केवळ १ हजार ५५५ क्विंटल उडीद, मूग आणि सोयाबीनची आवक झाली होती. कमी पावसाचा फटका मूग, उडीद आणि सोयाबीनलाही बसल्याने ही आवक कमी झाली आहे. दी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात जालना, भोकरदन, अंबड, बदनापूर, तीर्थपुरी आणि परतूर ही सहा खरेदी केंदे्र सुरू केली होती. त्यात उडदासाठी ३८३, मूग १ हजार १०७, सोयाबीन ७४८, अशी एकूण २ हजार २१९ क्विंटलची नोंदणी करण्यात आली होती. खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर १३८ शेतकऱ्यांनी उडीद ४४८, मूग ८८६ क्विंटल अशी एकूण ६०८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

नवीन गुळाची आवक जालना बाजारपेठेत बऱ्यापैकी असून, तीन ते साडेतीन हजार गुळाच्या भेली येत आहेत. आता फेडरेशनकडून तूर खरेदीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, अद्याप त्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी गजानन मगरे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी