शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

ग्रा.पं.च्या सामान्य फंडात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:55 AM

१२२ ग्रामपंचायतींपैकी अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावातील करवसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात ठणठणात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील १२२ ग्रामपंचायतींपैकी अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावातील करवसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात ठणठणात असल्याचे सूत्रांनी सांगितले.ग्रामपंचायत कार्यालयाचे वार्षिक नियोजन सामान्य फंडावर अवलंबून असते. कारण गावातून जमा होणाऱ्या विविध करामधून ग्रामपंचायत कर्मचा-यांचे मानधन, पथदिवे लावणे, गावातील नाल्यांची साफसफाई, याशिवाय वेळेवर येणारी कामे सुध्दा सामान्य फंडातून करावा लागतो. मात्र तालुक्यातील अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सामान्य फंड खाते निरंक आहे. मात्र सरपंच आणि ग्रामसेवकाने कर वसुलीसाठी म्हणावे तसे प्रयत्नच करण्यात येत नसल्याने याचा परिणाम ग्रामपंचायत विकासावर झाला आहे. गावागावा राजकीय हस्तक्षेपामुळे सुध्दा कर वसुलीस मर्यादा येत असल्याचे सागण्यात येत आहे.यामुळे अनेक गावात पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. विशेष म्हणणे सामान्य फंडात पैशाअभावी ग्रामपंचायत कर्मचा-यांचे मानधन सुध्दा वर्षानुवर्ष प्रलंबीत राहत आहे. यामुळे कर्मचा-यांना संसाराचा गाडा घाकणे दिवसेदिवस कठीण झाले आहे. अनेक वेळा गटविकास अधिका-याकडून गावस्तरावर कर वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येतात. मात्र कर भरण्यास नागरिकांची सुध्दा उदासिनता असल्याने म्हणावी तशी वसुली होण्यास अडचणी येत असल्याने सांगण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडून गावात पिण्याच्या पाणी, दिवाबत्ती, रस्ते दुरूस्ती आदी कामे करण्यात येतात. ग्रामपंचात कडून विविध सुविधा पुरविल्यानंतर सुध्दा नागरिकाकडून कर भरण्याबाबात दुर्लक्ष करण्यात येते. परिणामी ग्रामसेवकांनी कर वसुलीबाबात केलेल्या प्रयत्नासुध्दा यश येत नाही. परिणामी वसुली रखडली जात असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतfundsनिधी