शहरं
Join us  
Trending Stories
1
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
2
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
3
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
4
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
5
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
6
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
7
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
8
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
9
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
10
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
11
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
13
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
14
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
15
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
16
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
17
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
18
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
19
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
20
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

देवगिरी महाविद्यालयास रावसाहेब टोपे वादविवाद स्पर्धेचे सांघिक विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:34 AM

शिक्षणाने मानवी मूल्यांचे संवर्धन होते, असे प्रतिपादन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी कै. रावसाहेब टोपे मराठवाडा विभागीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारी केले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षणाने मानवी मूल्यांचे संवर्धन होते, असे प्रतिपादन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी कै. रावसाहेब टोपे मराठवाडा विभागीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारी केले. मत्स्योदरी शिक्षण संस्था व अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून पत्रकार संजय देशमुख, परीक्षक म्हणून डॉ.बा.आं. म. विद्यापीठाचे सदस्य डॉ. सदाशिव सरकटे, संत रामदास महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. राजेंद्र धाये, पत्रकार बाबासाहेब डोंगरे यांची उपस्थिती होती.‘प्रचलित शिक्षण व्यवस्था मानवी मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यास असमर्थ ठरत आहे’. या विषयानुसार पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण ११ महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदविला. एम.पी. लॉ. कॉलेज येथील कल्याणी काकडे हिने प्रथम, देवगिरी महाविद्यालय औरंगाबादची विद्यार्थिनी श्रुती पाटील हिने व्दितीय क्रमांक तर बारवाले महाविद्यालयाची विद्या अंभोरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला.यावेळी उपस्थितांचे स्वागत समितीप्रमुख प्रा. डॉ. कार्तिक गावंडे, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, प्रा. रमेश भुतेकर, डॉ. संभाजी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. कृष्णा कदम यांनी केले.अनिता शिंदे हिने स्वागत गीत सादर केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. ज्ञानदेव नागवे, प्रा. संजय गायकवाड, डॉ. विलास वरखडे, प्रा. ज्ञानेश्वर कळकटे, प्रा. डॉ. काळे व डॉ. श्रीपत गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास डॉ.दादासाहेब गजहंस, डॉ. पंडित रानमाळ, डॉ. सीमा निकाळजे, डॉ. सुजाता देवरे, डॉ. शिवकुमार सोळुंके, डॉ. शांताराम रायपुरे, डॉ. तुकाराम गजर, प्रा.संभाजी पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी