शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

उद्धव ठाकरेच आगामी मुख्यमंत्री : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 1:06 AM

महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेचे बोट धरून प्रवेश केला. आणि आता आमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. हे जनता विसरणार नाही. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा दावा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरूवारी येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात केला.

जालना : महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेचे बोट धरून प्रवेश केला. आणि आता आमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. हे जनता विसरणार नाही. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा दावा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरूवारी येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात केला.मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन बीज शीतल सीडस्च्या सभागृहात करण्यात आले होते. याचे उद्घाटन कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात शिवसैनिकांना प्रभावी भाषण कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. पुढे बोलताना कदम म्हणाले की, शिवसेनेचा जन्मच संघर्षासाठी झालेला आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना काढली. त्यांनी तळागाळातील सामान्य माणसाला नेतृत्वाची संधी देऊन मोठे केले. त्यातील मी देखील एक असल्याचे ते म्हणाले. जास्त भाषणबाजीपेक्षा शिवसेनेने नेहमीच जनतेच्या हिताच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाला महत्त्व दिले.राज्यात भाजप, शिवसेनेची युती टीकली ती प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळेच. आज स्थिती बदलली आहे. ज्या मतदार संघात निवडून येणे शक्य आहे, तेच मतदारसंघ भाजपाने त्यावेळी गोड बोलून शिवसेनेकडून घेतले आणि आम्हीही त्यांची मागणी पूर्ण करत गेलो. निवडणुकीतही त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचे काम केले नाही, उलट भाजपचा उमेदवार असला तरी शिवसैनिकांनी झोकून देऊन त्यांना विजयी केले.गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी आम्ही गाफिल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून युती तोडली. असे असतानाही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ६३ जागा जिंकल्या. आता तर आम्ही स्वबळावरच विधासभेवर भगवा फडकवून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणार असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारच्या नोटबंदी, गरिबांच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करण्याच्या निर्णयाचा रामदास कदम यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. प्लास्टिक बंदीचे समर्थन करतानाच आता गुटखाबंदीही करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्लास्टिक बंदीच्या मुद्यावरून नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर हल्ला करताना त्यांचे डोके ठिकाणावर नसल्याचे सांगितले. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळी आज जो नामविस्तार झाला आहे, तो शिवसेना प्रमुखांनीच सुचविला होता, मात्र त्याचे श्रेय दुसऱ्यांनीच लाटल्याचे सांगून त्यांनी शरद पवारांचे नाव न घेता टीका केली. प्रास्ताविक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले. यावेळी परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथील जिल्हा प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा संपर्क नेते विनोद घोसाळकर, प्रा. नितीन बानगुडे, जि. प. अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे, माजी आ. शिवाजी चोथे, संतोष सांबरे, भाऊसाहेब घुगे, विद्याथी सेनेचे जगन्नाथ काकडे, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, भरत कुसंदल, यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.राममंदिराच्या विटातून भाजपने कार्यालय बांधलेराम मंदिराचा मुद्दा आला की समजून घ्यायचे, निवडणुका आल्या आहेत. भाजपने राम मंदिर उभारणीसाठी देशातून एक, एक वीट जमा केली. कोकणातूनही अनेक रामभक्तांनी विटांची पूजा करून दिली. मात्र या विटातून भाजपने चिपळूण येथील भाजपचे कार्यालय बांधल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv Senaशिवसेना